शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

४९१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: May 3, 2016 01:04 IST

जालना : जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या, वस्त्यांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे

जालना : जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या, वस्त्यांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. ४१९ गावे व ७४ वाड्या मिळून ४९१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर ५७ लघु व ७ मध्यम प्रकल्प मिळून केवळ ३ टक्के जलसाठा आहे. आठ तालुक्यांतील ४१९ गावे व ७४ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे विहिरी व कूपनलिका एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्या. काही ठिकाणी जेमतेम पाणी होते तेही उन्हाचा पारा ४० अंशांवर गेल्याने तेही आटले. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरीभागातही तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक गावात विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे जुई, पद्मावती आदी मोठे प्रकल्प कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर असल्याने आगामी काळात जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ५७ लघू प्रकल्पांत फक्त १ टक्के पाणीसाठा आहे. तर सात मध्यम प्रकल्पांत ७ टक्के पाणीसाठा आहे. दोन्ही प्रकल्प मिळून केवळ ३ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी तीनची पाणी पातळी जोत्याखाली आहे. मध्यम प्रकलप एकही कोरडाठाक पडलेला नाही. ५७ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ४२ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १० प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. लहान मोठे प्रकल्प आटल्याने परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. शेतकरी तसेच पशुपालकांना जनावरे जगविणे जिकिरीचे बनले आहे. पाणीच नसल्याने काहींनी पशुधनाची विक्री सुरू केली आहे. कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पात १२ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात पाणी पातळी जोत्याखाली, अप्पर दुधना प्रकल्प २७ टक्के, जुई मध्यम प्रकल्प १ टक्के, धामणा मध्यम प्रकल्प पाणी पातळी जोत्याखाली, जिवरेखा मध्यम प्रकल्प पाणी पातळी जोत्याखाली, गल्हाटी मध्यम प्रकल्प १ टक्के पाणीसाठा आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकलप वगळता एकाही प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.