शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

४९१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: May 3, 2016 01:04 IST

जालना : जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या, वस्त्यांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे

जालना : जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या, वस्त्यांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. ४१९ गावे व ७४ वाड्या मिळून ४९१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर ५७ लघु व ७ मध्यम प्रकल्प मिळून केवळ ३ टक्के जलसाठा आहे. आठ तालुक्यांतील ४१९ गावे व ७४ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे विहिरी व कूपनलिका एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्या. काही ठिकाणी जेमतेम पाणी होते तेही उन्हाचा पारा ४० अंशांवर गेल्याने तेही आटले. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरीभागातही तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक गावात विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे जुई, पद्मावती आदी मोठे प्रकल्प कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर असल्याने आगामी काळात जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ५७ लघू प्रकल्पांत फक्त १ टक्के पाणीसाठा आहे. तर सात मध्यम प्रकल्पांत ७ टक्के पाणीसाठा आहे. दोन्ही प्रकल्प मिळून केवळ ३ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी तीनची पाणी पातळी जोत्याखाली आहे. मध्यम प्रकलप एकही कोरडाठाक पडलेला नाही. ५७ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ४२ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १० प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. लहान मोठे प्रकल्प आटल्याने परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. शेतकरी तसेच पशुपालकांना जनावरे जगविणे जिकिरीचे बनले आहे. पाणीच नसल्याने काहींनी पशुधनाची विक्री सुरू केली आहे. कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पात १२ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात पाणी पातळी जोत्याखाली, अप्पर दुधना प्रकल्प २७ टक्के, जुई मध्यम प्रकल्प १ टक्के, धामणा मध्यम प्रकल्प पाणी पातळी जोत्याखाली, जिवरेखा मध्यम प्रकल्प पाणी पातळी जोत्याखाली, गल्हाटी मध्यम प्रकल्प १ टक्के पाणीसाठा आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकलप वगळता एकाही प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.