शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:19 IST

खुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील पाच गावांना टँकरने तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करून प्रशासनाने शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाऊस नसल्याने पिके करपली आहेत. सर्वच जण पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. तालुक्यात आतापर्यंत फक्त २२.६० टक्केच पाऊस पडला आहे.खुलताबाद तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला होता. त्यानंतर पाऊस जो गायब झाला तो परत आलाच नाही. मध्यंतरी रिमझिम पावसाने पिके कशीबशी तग धरून उभी होती. परंतु गेल्या २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके करपू लागली आहेत. जमिनीतील पाणीसाठा खोलवर गेल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे टँकर सुरू करावे, म्हणून ग्रामपंचायतीने तालुका पंचायत समिती कार्यालयास पाणीटंचाईचे प्रस्तावही दाखल केले; परंतु ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या युक्तीप्रमाणे कागदी घोडे मिरविण्याचे काम सुरू आहे. पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तालुका प्रशासनाने शुक्रवारपासून गदाना, बोरवाडी, भडजी, ममनापूर, विरमगाव या पाच गावांना शासकीय पाण्याचे टँकर सुरू केले आहेत तर टाकळी राजेराय गावास ३ विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर बोरडमई , पळसगाव, लामणगाव, सराई येथे विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील खिर्डी, मावसाळा गावातही पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायत सोमवारी टँकरसाठी पंचायत समिती कार्यालयास प्रस्ताव दाखल करणार आहे. अशीच काही परिस्थिती तालुक्यातील इतर गावात निर्माण झाली असल्याने मुसळधार पाऊस न पडल्यास भरपावसाळ्यात टँकरची संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.तालुक्यात १३ आॅगस्टअखेर फक्त १७८ मि.मी. इतकाच म्हणजे २२.६० टक्केच पाऊस झाला असून तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९.५० इतकी असून गेल्यावर्षी आतापर्यंत ४०३ मि.मी पाऊस झाला होता. पंरतु यंदा पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया जाणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण दिसू लागले आहे.