शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

पावसाळ्यातही पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:19 IST

खुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील पाच गावांना टँकरने तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करून प्रशासनाने शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाऊस नसल्याने पिके करपली आहेत. सर्वच जण पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. तालुक्यात आतापर्यंत फक्त २२.६० टक्केच पाऊस पडला आहे.खुलताबाद तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला होता. त्यानंतर पाऊस जो गायब झाला तो परत आलाच नाही. मध्यंतरी रिमझिम पावसाने पिके कशीबशी तग धरून उभी होती. परंतु गेल्या २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके करपू लागली आहेत. जमिनीतील पाणीसाठा खोलवर गेल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे टँकर सुरू करावे, म्हणून ग्रामपंचायतीने तालुका पंचायत समिती कार्यालयास पाणीटंचाईचे प्रस्तावही दाखल केले; परंतु ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या युक्तीप्रमाणे कागदी घोडे मिरविण्याचे काम सुरू आहे. पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तालुका प्रशासनाने शुक्रवारपासून गदाना, बोरवाडी, भडजी, ममनापूर, विरमगाव या पाच गावांना शासकीय पाण्याचे टँकर सुरू केले आहेत तर टाकळी राजेराय गावास ३ विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर बोरडमई , पळसगाव, लामणगाव, सराई येथे विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील खिर्डी, मावसाळा गावातही पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायत सोमवारी टँकरसाठी पंचायत समिती कार्यालयास प्रस्ताव दाखल करणार आहे. अशीच काही परिस्थिती तालुक्यातील इतर गावात निर्माण झाली असल्याने मुसळधार पाऊस न पडल्यास भरपावसाळ्यात टँकरची संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.तालुक्यात १३ आॅगस्टअखेर फक्त १७८ मि.मी. इतकाच म्हणजे २२.६० टक्केच पाऊस झाला असून तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९.५० इतकी असून गेल्यावर्षी आतापर्यंत ४०३ मि.मी पाऊस झाला होता. पंरतु यंदा पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया जाणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण दिसू लागले आहे.