शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

शहराला केवळ एका जलकुंभ पॉर्इंटवरून होतोय पाणीपुरवठा

By admin | Updated: March 28, 2016 00:17 IST

लातूर : लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शहरात ६ ठिकाणी जलकुंभ टँकर पॉर्इंट असले तरी केवळ आर्वी येथील जलकुंभ टँकर पॉर्इंटवरूनच पाणी वितरीत केले जात आहे़

लातूर : लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शहरात ६ ठिकाणी जलकुंभ टँकर पॉर्इंट असले तरी केवळ आर्वी येथील जलकुंभ टँकर पॉर्इंटवरूनच पाणी वितरीत केले जात आहे़ अन्य जलकुंभात पाणी सोडल्यानंतर घट होत आहे़ त्यामुळे सध्यातरी आर्वी येथीलच जलकुंभ पॉर्इंटवरून टँकरद्वारे पाणी वितरण केले जात आहे़ रविवारी या पॉर्इंटवरून ६ हजार लिटर क्षमतेच्या १६६ टँकर फेऱ्या करून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ अन्य जलकुंभ कोरडेच आहेत़हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून बार्शी रोड पाण्याची टाकी, औसा रोडवरील पाण्याची टाकी आणि गांधी चौकातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडता येते़ त्यानुसार हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रात टँकरद्वारे आणलेले पाणी प्रस्तूत जलकुंभात टाकण्यात आले़ परंतू, जलकुंभाच्या मुख्य लाईनवर पाण्याचे मोठ मोठे कनेक्शन असल्यामुळे पाण्याची तुट झाली़ त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून जलकुंभात पाणी टाकण्याचे नियोजन आता बंद करण्यता आले आहे़ परिणामी शहरातल्या केवळ आर्वी येथील जलकुंभातूनच टँकरद्वारे पाणी वितरण केले जात आहे़ हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र ते गांधी चौक, सरस्वती कॉलनी आणि बार्शी रोडवरील पाण्याच्या टाकीत पाणी सोडल्यानंतर निम्म्या पाण्याची तुट होत आहे़ त्यामुळे मुख्य लाईनवरील मोठे कनेक्शन तोडले असले तरी या जलकुंभपॉर्इंटवरून पाणी टँकर भरणा बंद आहे़ त्यामुळे केवळ एका जलकुंभातून पाणी टँकर भरणा करून शहराला पुरवठा केला जात आहे़ ५ लाख लोकसंख्या असलेल्या शहराला एका जलकुंभावरून पाणी टँकरभरणा करून पाणी देण्यास प्रशसनाला कसरत करावी लागत आहे़ रविवारी दिवसभरात ६ हजार लिटर क्षमतेच्या केवळ १६६ टँकर फेऱ्या झाल्या़ ९ लाख लिटर्स पाण्याचे वितरण रविवारी झाले़ एका कुटूंबाला २०० लिटर हा नियम ग्राह्य धरला तरी ८ ते १० हजार कुटूंबांनाच पाणी मिळू शकले़ आर्वी जलकुंभ पॉर्इंटवरून शहराच्या नव्या वस्त्यांना पाणी देणे शक्य आहे़ तर बाभळगाव जलकुंभ टँकर पॉर्इंट सुरु करून जुन्या गाव भागात पाण्याचे वितरण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत़ पुर्ण शहराला व्यवस्थीत पाणी वितरण होण्यासाठी शहरातील सहाही जलकुंभ टँकर पॉर्इंट सुरु होणे आवश्यक आहे़ मात्र शासकीय जलकुंभ टँकर पॉर्इंट, सरस्वती कॉलनी कॉलनी जलकुंभ टँकर पॉर्इंट, गांधी चौक जलकुंभ टँकर पॉर्इंट, नांदेड नाका जलकुंभ टँकर पॉर्इंट, आणि कॉईल नगर जलकुंभ टँकर पॉर्इंट सध्यातरी बंद आहेत़ मनपा प्रशासनाने सहाही टँकर पॉर्इंटवरून पाणी वितरीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले़ परंतू, पाण्याची घट होत असल्याने प्रशासनासमोेर संकट उभे टाकले आहे़मागच्या आठवड्यात हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून ३० लाख लिटर पाणी शहरातील बार्शी रोड, औसा रोड आणि गांधी चौकातील जलकुंभात सोडले होते़ मात्र १२ लाख लिटरच पाणी आले़ निम्या पाण्याची घट झाली़ पाणी गेले कोठे़ याचा शोध घेतला असता हरंगुळ ते गांधी चौक जलकुंभ पॉर्इंटवरील मुख्य लाईनवर कनेक्शन होते़ हे कनेक्शन तोडले नव्हते़ त्यामुळे पाण्याची घट झाली़ ही बाब लक्षात आल्यानंतर ३० ते ३५ कनेक्शन तोडण्यात आले असले तरी या जलशुद्धी केंद्रातून जलकुंभात त्यानंतर सोडले नाही़ परिणामी, सध्या एकाच आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा आहे़