शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वाळूज एमआयडीसीतून ५ तालुक्यांना २०० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:52 IST

वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज महानगर : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी माणसांसह जनावरांचेही हाल होत असल्याने वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे राज्यभरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली आहे. औरंगाबाद तालुक्यासह वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड या पाच तालुक्यांत अनेक भागात तीव्र पाणी टंचाई सुरु आहे. गावची लोकसंख्या, जनावरांची संख्या व पाणीटंचाई लक्षात घेवून त्यानुसार टँकर मंजूर करण्यात येतात. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एमआयडीसीला दिला जातो. हा प्रस्ताव तपासून एमआयडीसी गरजेनुसार पाणी टँकर मंजूर करते.

त्यानुसार महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या एमआयडीसीच्या जलकुंभावरुन १२० व अन्य जलकुंभावरुन ६० ते ७० टँकर असे जवळपास २०० टँकरने या पाच तालुक्यांतील टंचाईग्रस्त भागात दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. याच बरोबर एमआयडीसीच्या शेंद्रा येथील जलकुंभावरुनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील भागात दररोज १०० टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

या संदर्भात एमआयडीसीचे अभियंता दिलीप परळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaluj MIDCवाळूज एमआयडीसी