शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

वाळूज एमआयडीसीतून ५ तालुक्यांना २०० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:52 IST

वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज महानगर : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी माणसांसह जनावरांचेही हाल होत असल्याने वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे राज्यभरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली आहे. औरंगाबाद तालुक्यासह वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड या पाच तालुक्यांत अनेक भागात तीव्र पाणी टंचाई सुरु आहे. गावची लोकसंख्या, जनावरांची संख्या व पाणीटंचाई लक्षात घेवून त्यानुसार टँकर मंजूर करण्यात येतात. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एमआयडीसीला दिला जातो. हा प्रस्ताव तपासून एमआयडीसी गरजेनुसार पाणी टँकर मंजूर करते.

त्यानुसार महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या एमआयडीसीच्या जलकुंभावरुन १२० व अन्य जलकुंभावरुन ६० ते ७० टँकर असे जवळपास २०० टँकरने या पाच तालुक्यांतील टंचाईग्रस्त भागात दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. याच बरोबर एमआयडीसीच्या शेंद्रा येथील जलकुंभावरुनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील भागात दररोज १०० टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

या संदर्भात एमआयडीसीचे अभियंता दिलीप परळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaluj MIDCवाळूज एमआयडीसी