शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीतून ५ तालुक्यांना २०० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:52 IST

वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज महानगर : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी माणसांसह जनावरांचेही हाल होत असल्याने वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे राज्यभरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली आहे. औरंगाबाद तालुक्यासह वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड या पाच तालुक्यांत अनेक भागात तीव्र पाणी टंचाई सुरु आहे. गावची लोकसंख्या, जनावरांची संख्या व पाणीटंचाई लक्षात घेवून त्यानुसार टँकर मंजूर करण्यात येतात. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एमआयडीसीला दिला जातो. हा प्रस्ताव तपासून एमआयडीसी गरजेनुसार पाणी टँकर मंजूर करते.

त्यानुसार महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या एमआयडीसीच्या जलकुंभावरुन १२० व अन्य जलकुंभावरुन ६० ते ७० टँकर असे जवळपास २०० टँकरने या पाच तालुक्यांतील टंचाईग्रस्त भागात दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. याच बरोबर एमआयडीसीच्या शेंद्रा येथील जलकुंभावरुनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील भागात दररोज १०० टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

या संदर्भात एमआयडीसीचे अभियंता दिलीप परळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaluj MIDCवाळूज एमआयडीसी