शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

२०० प्रकल्पांमध्ये साडेबारा टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 20, 2017 23:35 IST

उस्मानाबाद :जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़ तर ७३ प्रकल्पांची पाणीपातळी ही जोत्याखाली गेली आहे़ तर ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहूनही कमी पाणी उपलब्ध आहे़मागील तीन ते चार वर्षे अल्प पर्जन्यमान झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना जिल्हावासियांना करावा लागला आहे़ टंचाई निवारणार्थ उपायोजना करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते़ गतवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस दिलासादायक झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले होते़ शिवाय जलयुक्तमधील नदी खोलीकरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता़ विशेष म्हणजे अनेक प्रकल्पांमधील गाळाचा उपसा केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला होता़ सप्टेंबर २०१६ नंतरच्या आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० प्रकल्पांमध्ये केवळ १२़६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर १९ प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत़ ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून कमी प्रमाणात पाणी शिल्लक आहे़ तर २५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाणी आहे़ केवळ ४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणी उपलब्ध आहे़ जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प कोरडेठाक आहेत़ उर्वरित प्रकल्पांमध्ये ६७६़७२७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ उपयुक्त पाण्याची टक्केवारी १२़६८ टक्के आहे़ मागील आठवड्यात १३़३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ एका आठवड्यात प्रकल्पांमधील ०.६३ टक्के पाण्याचा झाला. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ०.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा मुबलक असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़