शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

२०० प्रकल्पांमध्ये साडेबारा टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 20, 2017 23:35 IST

उस्मानाबाद :जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़ तर ७३ प्रकल्पांची पाणीपातळी ही जोत्याखाली गेली आहे़ तर ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहूनही कमी पाणी उपलब्ध आहे़मागील तीन ते चार वर्षे अल्प पर्जन्यमान झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना जिल्हावासियांना करावा लागला आहे़ टंचाई निवारणार्थ उपायोजना करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते़ गतवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस दिलासादायक झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले होते़ शिवाय जलयुक्तमधील नदी खोलीकरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता़ विशेष म्हणजे अनेक प्रकल्पांमधील गाळाचा उपसा केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला होता़ सप्टेंबर २०१६ नंतरच्या आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० प्रकल्पांमध्ये केवळ १२़६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर १९ प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत़ ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून कमी प्रमाणात पाणी शिल्लक आहे़ तर २५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाणी आहे़ केवळ ४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणी उपलब्ध आहे़ जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प कोरडेठाक आहेत़ उर्वरित प्रकल्पांमध्ये ६७६़७२७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ उपयुक्त पाण्याची टक्केवारी १२़६८ टक्के आहे़ मागील आठवड्यात १३़३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ एका आठवड्यात प्रकल्पांमधील ०.६३ टक्के पाण्याचा झाला. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ०.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा मुबलक असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़