शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: September 4, 2016 01:05 IST

औरंगाबाद : सलग चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : सलग चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यातही गंगापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ४१ टक्के इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींना अजूनही पाणी आलेले नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागावर टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात आतापर्यंत ६५ टक्के उपयुक्त साठा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. असे असले तरी ग्रामीण भागात मात्र, यंदाही टंचाईचे सावट आढळून येत आहे. जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६७५ मि. मी. इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी केवळ ४२२ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के एवढे आहे. पैठण तालुक्यातही केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. तर सोयगाव तालुक्यात ५८ टक्के आणि खुलताबाद तालुक्यात ६० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पाऊस हा औरंगाबाद तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ ७२ टक्के पाऊस सिल्लोड तालुक्यात पडला आहे. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठे जलसाठे अजूनही रिकामेच आहेत. याशिवाय विहिरींनाही पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे पाणीसाठ्याची मदार आता परतीच्या पावसावरच अवलंबून आहे.