शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: September 4, 2016 01:05 IST

औरंगाबाद : सलग चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : सलग चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यातही गंगापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ४१ टक्के इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींना अजूनही पाणी आलेले नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागावर टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात आतापर्यंत ६५ टक्के उपयुक्त साठा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. असे असले तरी ग्रामीण भागात मात्र, यंदाही टंचाईचे सावट आढळून येत आहे. जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६७५ मि. मी. इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी केवळ ४२२ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के एवढे आहे. पैठण तालुक्यातही केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. तर सोयगाव तालुक्यात ५८ टक्के आणि खुलताबाद तालुक्यात ६० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पाऊस हा औरंगाबाद तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ ७२ टक्के पाऊस सिल्लोड तालुक्यात पडला आहे. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठे जलसाठे अजूनही रिकामेच आहेत. याशिवाय विहिरींनाही पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे पाणीसाठ्याची मदार आता परतीच्या पावसावरच अवलंबून आहे.