शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

प्रयोगशाळेत ४ वर्षांपासून पाणीटंचाई

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

औरंगाबाद : औरंगाबादसह जिल्ह्यातील विविध तालुके आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची तपासणी करणार्‍या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळा चार वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत.

औरंगाबाद : औरंगाबादसह जिल्ह्यातील विविध तालुके आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची तपासणी करणार्‍या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळा चार वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. या प्रयोगशाळेने नळजोडणी मिळण्यासाठी छावणी परिषदेकडे पाठपुरावा केला; परंतु अधिकारी दाद देत नसल्याचे समोर आले आहे. आजही प्रयोगशाळेतील अधिकारी कार्यालयात येताना घरूनच पाण्याच्या बाटल्या आणतात. प्रादेशिक प्रयोगशाळा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेते. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून त्याचा अहवाल देत असते. त्यामुळे साथरोगावर नियंत्रण ठेवणे अधिकार्‍यांना शक्य होते. अशा या महत्त्वाच्या कार्यालयातील पिण्याच्या पाणी प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. चार वर्षांपूर्वी प्रयोगशाळेच्या नळाची पाईपलाईन लष्कराने केलेल्या खोदकामामुळे फुटली व पाणीपुरवठा बंद पडला. प्रयोगशाळेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सूर्यवंशी यांनी छावणी परिषदेच्या सीईओंना भेटून तुटलेली पाईपलाईन जोडून देण्याची विनंती केली. मात्र, लष्कराच्या अधिकार्‍यांनी त्या ठिकाणाहून नळजोडणी देण्यास नकार दिला. दरम्यान, सूर्यवंशी गेल्यावर्षी निवृत्त झाले. त्यांच्यानंतर मुख्य अनुजीवशास्त्रज्ञ एस.व्ही. पत्की प्रभारी अधिकारी म्हणून आले. त्यांनीही नळजोडणीसाठी छावणी परिषदेच्या अधिकार्‍यांना पत्र दिले. मुख्य जलवाहिनी ते प्रयोगशाळेदरम्यान पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्यासाठी पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून देण्याची विनंती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही अंदाजपत्रक देण्यास टाळाटाळ होत असल्याचे पत्की यांनी सांगितले. घरून आणावे लागते पाणी प्रयोगशाळेत चार वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी कामाला येताना घरूनच पाण्याची बाटली आणतात. शहराबाहेर असलेल्या या प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणीसाठी घेऊन जाणार्‍या व्यक्तीलाही अधिकारी आपल्याकडील बाटलीतील पाणी पिण्यास देतात.