शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा मंत्रालयीन पथकाने घेतला आढावा

By admin | Updated: April 28, 2015 00:28 IST

जालना : जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा मंत्रालयीन समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला

जालना : जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा मंत्रालयीन समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. टंचाई निवारणार्थ आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव तातडीने या समितीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत, कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटणी, सहाय्यक राम साबणे यांचा समावेश होता. यावेळी बोलताना उपसचिव महेश सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करताना टँकरद्वारे पाणीपुरवठा ही सर्वात शेवटची उपाययोजना असून आवश्यकता असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. तसेच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात. टंचाई निवारणार्थ आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव मंत्रालयास पाठविले नसतील तर ते तातडीने पाठविण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी या बैठकीस केल्या. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, परतूरचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, अंबडचे श्रीमंत हरकर, तहसीलदार छाया पवार, महेश सावंत, बालाजी क्षीरसागर, ज्योत्स्ना धुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी पथकास जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देऊन उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. ४तसेच जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांनी मंत्रालयीन पथकास पॉवर पॉर्इंट प्रेझेटेशनद्वारे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, गावांची संख्या, गावे, जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये उपलब्ध पाणीसाठा, नवीन विंधन विहिरी घेणे, विहिरींची विशेष दुरूस्ती, नळयोजना, तात्पुरती पूरक नळयोजना त्याचबरोबर आवश्यक असलेल्या निधीची माहिती दिली.