शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

टंचाई निवारणासाठी पाणी साठवा अभियान

By admin | Updated: June 15, 2014 00:56 IST

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ पाणीटंचाईमुळे कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने अनोखी मोहीम सुरू केली

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळपाणीटंचाईमुळे कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने अनोखी मोहीम सुरू केली असून, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘पान साठवा-गाव वाचवा’ हे अभियान सुर करण्यात आले आहे़ या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट पाणी साठवण करून जमिनीत मुरविणाऱ्या ग्रामपंचायतीस रोख पुरस्काराबरोबरच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातून अनेक हंगामी योजना राबविण्यात येतात़ अधिग्रहण करून लोकांची सोय केली जाते़ यासाठी लाखो रूपयांचा खर्चही होतो़ म्हणून शासनाने आता पावसाळा सुरु होण्यापूर्वी अनोखी स्पर्धात्मक मोहीम सुरु केली आहे़ यासाठी ‘पाणी साठवा-गाव वाचवा’ हे अभियान सुरू करून पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला जावा यासाठी मे महिन्याच्या अखेरीस शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे़ पाणीपुरवठ्यासाठी योजनांचा समावेश यात राहणार आहे़ सदरील अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सन २०१४-१५ या वर्षात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, यासाठी सुचित केले आहे़ त्यामुळे शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी शुक्रवारी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांची बैठक घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी माहिती दिली आहे़ यावेळी विस्तार अधिकारी बालाजी पोतदार उपस्थित होते़पाच महिन्याचा कालावधी़़़या अभियानाचा कालावधी १५ आॅक्टोबरपर्यंत म्हणजे पाच महिने राहणार असून, या पाच महिन्याच्या कालावधीत जेवढा पाऊस होणार आहे़ त्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे़ यात पाणी पुरवठ्याच्या सर्व योजनांचा समावेश राहणार आहे़४सदरील अभियान लोकसहभाग, वित्त आयोग विविध योजनांच्या निधींचा सहभाग याच्या माध्यमातून राबविले जाणार असल्याने तालुक्यातील सर्वच म्हणजे ४३ ग्रामपंचायती सक्रिय सहभागी होणार असल्याचे विस्तार अधिकारी पोतदार यांनी सांगितले़