शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभाग सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: September 12, 2016 23:22 IST

औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत.

औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढतो आहे. दुसरीकडे शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आकृतिबंधानुसार राज्यभरात जलसंपदा विभागांतर्गत एकूण ४५ हजार पदे मंजूर आहेत. यामध्ये शिपाई, कारकून, कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यासह सर्वच पदांचा समावेश आहे. सध्या यातील २८ हजार अधिकारी, कर्मचारीच कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचारी खूप मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. परिणामी एकेका अधिकाऱ्यांकडे दोन दोन पदांचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. शिवाय कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही कामाचा ताण सहन करावा लागत आहे. मेअखेरीस एकाच महिन्यात जलसंपदा विभागातील तब्बल १२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. याशिवाय चालू महिन्यात म्हणजे सप्टेंबरअखेरीसही १६१ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. सध्या कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या चार वर्षांत खात्यातील तब्बल पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याचे जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.एकट्या औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९२ पदांपैकी तब्बल १३१४ पदे रिक्त आहेत. कडा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना आणि परभणी हे तीन जिल्हे येतात. रिक्त पदांपैकी बहुसंख्य पदे ही सिंचन व्यवस्थापनाशी निगडित आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. कालवा निरीक्षकाच्या ६०० मंजूर पदांपैकी सध्या केवळ १५२ कालवा निरीक्षकच कार्यरत आहेत. उर्वरित ४४८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे दप्तर कारकुनाच्या १९५ पदांपैकी १०३ पदे रिक्त आहेत. मोजणीदाराच्या ३०० पदांपैकी १९५ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे इतर संवर्गातीलही असंख्य पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंचन कर्मचारी संघटनेने काही दिवसांपूर्वीच रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.