शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जलसंपदा विभाग सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: September 12, 2016 23:22 IST

औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत.

औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढतो आहे. दुसरीकडे शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आकृतिबंधानुसार राज्यभरात जलसंपदा विभागांतर्गत एकूण ४५ हजार पदे मंजूर आहेत. यामध्ये शिपाई, कारकून, कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यासह सर्वच पदांचा समावेश आहे. सध्या यातील २८ हजार अधिकारी, कर्मचारीच कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचारी खूप मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. परिणामी एकेका अधिकाऱ्यांकडे दोन दोन पदांचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. शिवाय कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही कामाचा ताण सहन करावा लागत आहे. मेअखेरीस एकाच महिन्यात जलसंपदा विभागातील तब्बल १२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. याशिवाय चालू महिन्यात म्हणजे सप्टेंबरअखेरीसही १६१ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. सध्या कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या चार वर्षांत खात्यातील तब्बल पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याचे जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.एकट्या औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९२ पदांपैकी तब्बल १३१४ पदे रिक्त आहेत. कडा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना आणि परभणी हे तीन जिल्हे येतात. रिक्त पदांपैकी बहुसंख्य पदे ही सिंचन व्यवस्थापनाशी निगडित आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. कालवा निरीक्षकाच्या ६०० मंजूर पदांपैकी सध्या केवळ १५२ कालवा निरीक्षकच कार्यरत आहेत. उर्वरित ४४८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे दप्तर कारकुनाच्या १९५ पदांपैकी १०३ पदे रिक्त आहेत. मोजणीदाराच्या ३०० पदांपैकी १९५ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे इतर संवर्गातीलही असंख्य पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंचन कर्मचारी संघटनेने काही दिवसांपूर्वीच रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.