शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

पाणी योजनांच्या निधीस कात्री

By admin | Updated: February 22, 2016 00:19 IST

संजय तिपाले , बीड दुष्काळाचे भीषण चटके सोसणाऱ्या बीडकरांच्या तोंडाला राज्याच्या पाणीपुरवठा विभागानेही पाने पुसली आहेत. दरवर्षी पाणी योजनांसाठी जिल्ह्याला साधारण ६० कोटी रुपयांचा निधी दिला जातो,

 

संजय तिपाले , बीड

दुष्काळाचे भीषण चटके सोसणाऱ्या बीडकरांच्या तोंडाला राज्याच्या पाणीपुरवठा विभागानेही पाने पुसली आहेत. दरवर्षी पाणी योजनांसाठी जिल्ह्याला साधारण ६० कोटी रुपयांचा निधी दिला जातो, यंदा वाढीव निधी तर दूरच; परंतु नियमित निधीलाही कात्री लावली आहे. त्यामुळे ‘ऐन दुष्काळात तेरावा महिना...’ याची प्रचिती आली आहे. आधीच ‘जुन्या योजना पूर्ण केल्याशिवाय नव्या योजना नाहीत’ असा फतवा या विभागाने काढलेला आहे, पाठोपाठ केवळ २२ कोटी रुपयांची तरतूद केल्याने जिल्हा पुरता जलसंकटात लोटला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २०१४-१५ मध्ये ३१४ पाणी योजनांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी १४४ योजनांची कामे पूर्ण झाली. २०१४- १५ मध्ये ९६ तर २०१५- १६ मध्ये ४८ योजना अंतिम झाल्या. उर्वरित १३६ योजना अपूर्ण असून इतर ३४ योजनांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. १७ पाणीयोजनांच्या समित्यांवर फौजदाीरी फौजदारी कारवाईचा बडगा उगारलेल्या १७ योजनांचा यात समावेश आहे. गावपातळीवर सत्तापालट झाल्यानंतर तक्रारींचा वाढता ओघ, परिणामी रखडलेले अंतिमीकरण, काही गावांत टाकी आहे, तर पाईपलाईन नाही. कोठे पाईपलाईन आहे तर विहीर नाही... काही ठिकाणी तर एकाच विहिरीवर दोनदा निधी हडप..! अर्धवट योजना असलेल्या गावांच्या अशा वेगवेगळ्या तऱ्हा..! १३६ योजना पूर्ण करण्याचे आव्हान जि. प. यंत्रणेसमोर कायम आहे. ‘आधी अपूर्ण योजना पूर्ण करा, त्यानंतरच नव्या योजना...’ ही भूमिका राज्याचा पाणीपुरवठा विभागाने यापूर्वीच घेतली होती. गेल्या आठवड्यांत जि.प. सीईओंना पाठविलेल्या पत्रांतून सचिव राजेशकुमार यांनी त्याची पुन्हा आठवण करुन दिली. त्यामुळे दुष्काळी स्थिती गंभीर असताना ‘अर्धवटरावां’मुळे इतर गावांतील पाणी योजनांचा मार्ग अडवून धरला. २०१६-१७ या वर्षासाठी केवळ २१ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून एकही नवीन योजना राबविली जाणार नाही. केवळ अपूर्ण १३६ योजना पूर्णत्वाकडे न्यायच्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे यापैकी फक्त ७० योजना पूर्ण होतील, असा आराखडा जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा विभागाला पाठविला आहे. ४७ योजनांची प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. गुन्हे नोंद झालेल्या १७ योजनांचा यात समावेश आहे. उर्वरित योजना अपहार, तक्रारींमुळे न्यायप्रविष्ट आहेत. याशिवाय चोपनवाडी (ता. माजलगाव) व कोळवाडी (ता. शिरुर) या योजनांचा निधी जिल्हा बँकेत अडकल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.