शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

कंधारला ‘लिंबोटी’तून पाणी

By admin | Updated: August 10, 2014 02:23 IST

कंधार : शहाराचा पाणी प्रश्न पाणी स्त्रोताअभावी ऐरणीवर आला होता. राज्यशासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेला २५ कोटी ६७ लाखाची

कंधार : शहाराचा पाणी प्रश्न पाणी स्त्रोताअभावी ऐरणीवर आला होता. राज्यशासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेला २५ कोटी ६७ लाखाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली. ८ आॅगस्ट रोजी न.प. विशेष सभेत सर्वानुमते कामाची निविदा मंजुरीचा ठराव पारीत करण्यात आला. लिंबोटी धरणातून पाणी आणून शहराची कायमची पाणी टंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. शहराची तहान मानार नदी व जगतुंग समुद्रातील पाणी स्त्रोतावर अवलंबून आहे. पर्जन्यमानाचा सततचा लहरीपणा, मानार नदी व जगतुंग समुद्रातील घटत असलेला जलस्त्रोत आदीमुळे शहरावर सतत पाणी टंचाईचे ढग असतात. यासाठी न.प.ने महाराष्ट्र शासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेचा सुमारे ३६ कोटीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. प्रस्तावात दरडोई १३५ लिटरचा समावेश होता. परंतु शासनाने प्रतिदिन प्रति मनुष्य ७० लिटर प्रमाणे २५ कोटी ६७ लाखाची पा.पु. योजनेला मार्च २०१४ ला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली. तरीही निविदा मान्य करणे, पाणी पुरवठा करुन पाणी प्रश्न निकाली काढताना मात्र न.प. मधील गटा-तटाचे राजकारण अडसर ठरते की काय? अशी भिती नागरिकातून व्यक्त केली जात होती.८ आॅगस्ट रोजी विशेष सभा नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्वानुमते निविदा मान्य करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व तिर १४ अशा १६ जणांनी यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. लिंबोटी धरणाच्या (अप्पर मानार प्रकल्प) बुडीत क्षेत्रातून अशुद्ध पाणी उपसा करुन २५ कि.मी.च्या उद्धरण नलिकेद्वारे शहरात आणण्याचे प्रकल्पीत आहे. लिंबोटी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जौकवेल हाऊस आणि उद्धरण नलिका, पंपींग मशिनरी, भिमगड येथे उंच जलकुंभ, नवीन वाढ वस्तीत वितरण व्यवस्था अंथरणे आदी कामाचा त्यात समावेश आहे.योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा आगामी ५० वर्षाचा पिण्याचा पाणी प्रश्न योजनेमुळे दूर होणार असून १२ महिने मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होईल, असे नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सतत भेडसावणारी पाणी टंचाई आता या योजनेमुळे दूर होणार आहे. शोभाताई नळगे यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे व नागरिकांना कायमचा दिलासा देणारे काम असल्याची भावना नागरिकतून व्यक्त होत आहे. योजनेचे काम कमी काळात व जलद गतीने पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिकातून होत आहे. (वार्ताहर)