शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

माजलगाव धरणाची पाणीपातळी तळास

By admin | Updated: June 22, 2014 00:03 IST

माजलगाव: येथील धरणातील पाणीपातळी चार टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासह परळी येथील औद्योगिभ केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

माजलगाव: येथील धरणातील पाणीपातळी चार टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासह परळी येथील औद्योगिभ केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर पश्न निर्माण झाला आहे. माजलगाव धरणाची पाणी साठवण क्षमता ४३१.८० मीटर येवढी आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने या धरणात केवळ ४२ टक्के पाणीसाठा झाला होता. या धरणातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असते. या धरणामुळे माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागायती शेती केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनाही धरणामुळे चांगले पाणी असल्याने त्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीसह भाजीपाला, फळबागाही केलेल्या आहेत. यामुळे या धरणातील पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. शेतीसह या धरणातील पाण्यामुळे बीड, माजलगावसह परिसरातील अनेक गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणातील पाणी आटल्याने आता शेतकऱ्यांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावत आहे. माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्यातून एप्रिल व मे महिन्यात दोन पाणीपाळ्या शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आल्या होत्या. या दोन्ही पाणी पाळ्यांसाठी ३२.५३७ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले होते. पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले. अद्यापही धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. गत आठवड्यात सिंदफणा नदीला काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र, यानंतरही धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी टंचाई आराखड्यात या धरणातील १०.७९ टक्के पाणी आरक्षित केले आहे. धरणातील १. ०८ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होऊ शकते, असा अंदाज आहे. धरणात सध्ये ३. ८४ द.ल.घ.मी. पाणी आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यासह परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित केले आहे, अशी माहिती अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली. माजलगाव धरणातील सर्व पाणी आरक्षित केल्याने हे पाणी जोत्याच्या खाली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे एकही पाणी मिळू शकणार नाही.मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेल्याने व यापुढे धरणातून पाणी मिळणार नसल्यान ज्या शेतकऱ्यांनी धरणाच्या पाण्यावर ऊस, भाजीपाला व फळबागा केल्या आहेत, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. खडका धरणात सोडले होते पाणीखडका धरणातून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रास पाणीपुरवठा केला जातो. खडका धरणातील पाणी दोन महिन्यांपूर्वीच आटले होते. यामुळे परळी येथील विद्युत निर्मिती करणारे काही संच बंद ठेवण्याची वेळ आली होती. येथील सर्वच विद्युत निर्मिती बंद पडू नये, यासाठी माजलगाव धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (वार्ताहर)धरणातील उपसा बंद करणारउपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे म्हणाले की, येत्या काळात पाऊस न झाल्यास पाण्याचे नियोजन आणखी करावे लागेल. जे शेतकरी पाईपलाईन करून धरणातून पाणी उपसा करतात, त्यांचा पाणीउपसाही बंद करणार असल्याचे कांबळे म्हणाले.