शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

विहिरींच्या पाणीपातळीत वाढ

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

नांदेड: पोळ्यानंतर सुरु झालेल्या पावसाने गणेशोत्सव स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दमदार हजेरी लावल्याने कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

नांदेड: पोळ्यानंतर सुरु झालेल्या पावसाने गणेशोत्सव स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दमदार हजेरी लावल्याने कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे विहिरी-बोअरमधील पाणीपातळी वाढल्याने बळीराजा सुखावला असून नागरिक तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी सुटला आहे.यावर्षी मृग नक्षत्र सुरु होऊन दोन - अडीच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पावसाने विश्रांतीच घेतली होती, यामुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठे पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले होते. शिवाय जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचाही मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला होता. तसेच शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करुनही पाण्याअभावी हजारो हेक्टरवरील पिके मातीत गेली. यामुळे सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यानंतर पोळ््याच्या पूुर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली गणेशोत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत निसर्गाने कृपा केल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे.पाऊसच नसल्याने विहिरी-बोअरमधील पाणीपातळी कमालीची खालावली होती, तर काही भागातील विहिरी-बोअर, हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यात टँकरची संख्याही वाढली होती. मात्र गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने विहिरी-बोअरमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक भागातील विहिरी काठोकाठ भरल्यामुळे तसेच विष्णूपुरीसह इतर भागातील छोटे-मोठे प्रकल्प भरल्याने दोन महिन्यांपासून चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. जिल्ह्यातील काही भागातील खरीप हंगाम हातचा गेला असला तरी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे तसेच प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर पुढचा रबीचा हंगाम तरी पदरात पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. (प्रतिनिधी)