शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

विहिरींच्या पाणीपातळीत वाढ

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

नांदेड: पोळ्यानंतर सुरु झालेल्या पावसाने गणेशोत्सव स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दमदार हजेरी लावल्याने कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

नांदेड: पोळ्यानंतर सुरु झालेल्या पावसाने गणेशोत्सव स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दमदार हजेरी लावल्याने कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे विहिरी-बोअरमधील पाणीपातळी वाढल्याने बळीराजा सुखावला असून नागरिक तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी सुटला आहे.यावर्षी मृग नक्षत्र सुरु होऊन दोन - अडीच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पावसाने विश्रांतीच घेतली होती, यामुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठे पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले होते. शिवाय जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचाही मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला होता. तसेच शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करुनही पाण्याअभावी हजारो हेक्टरवरील पिके मातीत गेली. यामुळे सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यानंतर पोळ््याच्या पूुर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली गणेशोत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत निसर्गाने कृपा केल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे.पाऊसच नसल्याने विहिरी-बोअरमधील पाणीपातळी कमालीची खालावली होती, तर काही भागातील विहिरी-बोअर, हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यात टँकरची संख्याही वाढली होती. मात्र गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने विहिरी-बोअरमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक भागातील विहिरी काठोकाठ भरल्यामुळे तसेच विष्णूपुरीसह इतर भागातील छोटे-मोठे प्रकल्प भरल्याने दोन महिन्यांपासून चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. जिल्ह्यातील काही भागातील खरीप हंगाम हातचा गेला असला तरी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे तसेच प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर पुढचा रबीचा हंगाम तरी पदरात पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. (प्रतिनिधी)