शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

३.२९ मीटरने घटली पाणीपातळी

By admin | Updated: February 17, 2016 00:36 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या १०९ विहिरींतील सर्वेक्षणावरून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ३.२९ मीटरने पाणीपातळीत घट झाली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ४.४९ मीटरने पाणीपातळी घटली आहे. अहमदपूर तालुक्यातील १५, औसा १५, चाकूर ७, लातूर १८, निलंगा १७, शिरूर अनंतपाळ ५, रेणापूर ११, उदगीर ९, जळकोट ४, देवणी ८ अशा एकूण १०९ विहिरींचे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत करण्यात येते. दर तीन महिन्याला सर्वेक्षण केले जात असल्यामुळे किती मीटरने पाणीपातळीत घट झाली, हे लक्षात येते. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत औसा तालुक्यात २.७८, चाकूर तालुक्यात ३.६०, लातूर तालुक्यात ३.४९, निलंगा २.८३, शिरूर अनंतपाळ २.८१, रेणापूर २.६४, उदगीर ३.२७, जळकोट ४.४२, देवणी २.५२ तर अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ४.४९ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. सरासरी जिल्ह्याच्या पाणीपातळीत ३.२९ मीटरने घट झाली आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात असल्याने विंधन विहिरींचे पाणीही गायब होत आहे. (प्रतिनिधी)