शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:02 IST

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.

पैठण : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.नाथसागराच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून (हॅड्रो) गोदावरी पात्रामध्ये सोमवारी सायंकाळी ५ वाजता पाणी सोडण्यात आले. तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण व ‘हॅड्रो’चे उपकार्यकारी अभियंता उमेश सोन्ने यांनी स्वयंचलीत यंत्राचे बटन दाबून प्रतिसेकंद १ हजार ६०० क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडले. यावेळी आ. भुमरे यांचे स्वीय सहायक नामदेव खराद उपस्थित होते. एकूण १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असून यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत.पाणीटंचाई लक्षात घेता गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी आ. संदीपान भुमरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गोदावरीवर बांधलेला आपेगाव निम्नबंधारा ७.५० दशलक्ष घनमीटर जलसाठवण क्षमतेचा असून आजमितीस हा बंधारा कोरडाठाक पडलेला आहे. ८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या हिरडपुरी बंधाºयानेही तळ गाठला आहे. सिंचनासाठी गोदावरी पात्रातून पाणी सोडण्यात येऊन आपेगाव व हिरडपुरी बंधारे भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत १४ एप्रिल रोजी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पैठणपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेला आपेगाव निम्नबंधारा व २१ किलोमीटरवरचा हिरडपुरी बंधारा या पाण्याने भरून घेतला जाणार आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या नदीकाठच्या परिसरातील हजारो जनावरांना याच लाभ मिळणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून जायकवाडी धरणातून दोन्ही बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची दखल घेऊन पाणी सोडले आहे, असे भुमरे म्हणाले.गोदाकाठी सतर्कतेचा इशारानाथसागर जलाशयातून १५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग जलविद्युत निर्मिती केंद्राच्या आऊट लेटमधून करण्यात येणार आहे, असा संदेश देण्यात आला. सदरील पाणी हे आपेगाव-हिरडपुरी बंधाºयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.४या वेळेनंतर पाणी स्थिर होईपर्यंत कोणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये किंवा आपली जनावरे, मालमत्ता नदीपात्रात घेऊन जाऊ नये, आपापल्या जीविताचे व मालमत्तेचे स्वसंरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.१४ गावे : गोदावरी नदीकाठावर १४ गावे असून यातील पैठण, पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, घेवरी, तळजापूर व हिरडपुरी आदी गावांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय २० गावांना अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.

टॅग्स :DamधरणelectricityवीजJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरी