शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:02 IST

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.

पैठण : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.नाथसागराच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून (हॅड्रो) गोदावरी पात्रामध्ये सोमवारी सायंकाळी ५ वाजता पाणी सोडण्यात आले. तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण व ‘हॅड्रो’चे उपकार्यकारी अभियंता उमेश सोन्ने यांनी स्वयंचलीत यंत्राचे बटन दाबून प्रतिसेकंद १ हजार ६०० क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडले. यावेळी आ. भुमरे यांचे स्वीय सहायक नामदेव खराद उपस्थित होते. एकूण १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असून यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत.पाणीटंचाई लक्षात घेता गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी आ. संदीपान भुमरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गोदावरीवर बांधलेला आपेगाव निम्नबंधारा ७.५० दशलक्ष घनमीटर जलसाठवण क्षमतेचा असून आजमितीस हा बंधारा कोरडाठाक पडलेला आहे. ८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या हिरडपुरी बंधाºयानेही तळ गाठला आहे. सिंचनासाठी गोदावरी पात्रातून पाणी सोडण्यात येऊन आपेगाव व हिरडपुरी बंधारे भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत १४ एप्रिल रोजी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पैठणपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेला आपेगाव निम्नबंधारा व २१ किलोमीटरवरचा हिरडपुरी बंधारा या पाण्याने भरून घेतला जाणार आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या नदीकाठच्या परिसरातील हजारो जनावरांना याच लाभ मिळणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून जायकवाडी धरणातून दोन्ही बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची दखल घेऊन पाणी सोडले आहे, असे भुमरे म्हणाले.गोदाकाठी सतर्कतेचा इशारानाथसागर जलाशयातून १५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग जलविद्युत निर्मिती केंद्राच्या आऊट लेटमधून करण्यात येणार आहे, असा संदेश देण्यात आला. सदरील पाणी हे आपेगाव-हिरडपुरी बंधाºयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.४या वेळेनंतर पाणी स्थिर होईपर्यंत कोणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये किंवा आपली जनावरे, मालमत्ता नदीपात्रात घेऊन जाऊ नये, आपापल्या जीविताचे व मालमत्तेचे स्वसंरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.१४ गावे : गोदावरी नदीकाठावर १४ गावे असून यातील पैठण, पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, घेवरी, तळजापूर व हिरडपुरी आदी गावांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय २० गावांना अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.

टॅग्स :DamधरणelectricityवीजJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरी