शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:02 IST

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.

पैठण : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.नाथसागराच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून (हॅड्रो) गोदावरी पात्रामध्ये सोमवारी सायंकाळी ५ वाजता पाणी सोडण्यात आले. तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण व ‘हॅड्रो’चे उपकार्यकारी अभियंता उमेश सोन्ने यांनी स्वयंचलीत यंत्राचे बटन दाबून प्रतिसेकंद १ हजार ६०० क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडले. यावेळी आ. भुमरे यांचे स्वीय सहायक नामदेव खराद उपस्थित होते. एकूण १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असून यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत.पाणीटंचाई लक्षात घेता गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी आ. संदीपान भुमरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गोदावरीवर बांधलेला आपेगाव निम्नबंधारा ७.५० दशलक्ष घनमीटर जलसाठवण क्षमतेचा असून आजमितीस हा बंधारा कोरडाठाक पडलेला आहे. ८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या हिरडपुरी बंधाºयानेही तळ गाठला आहे. सिंचनासाठी गोदावरी पात्रातून पाणी सोडण्यात येऊन आपेगाव व हिरडपुरी बंधारे भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत १४ एप्रिल रोजी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पैठणपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेला आपेगाव निम्नबंधारा व २१ किलोमीटरवरचा हिरडपुरी बंधारा या पाण्याने भरून घेतला जाणार आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या नदीकाठच्या परिसरातील हजारो जनावरांना याच लाभ मिळणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून जायकवाडी धरणातून दोन्ही बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची दखल घेऊन पाणी सोडले आहे, असे भुमरे म्हणाले.गोदाकाठी सतर्कतेचा इशारानाथसागर जलाशयातून १५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग जलविद्युत निर्मिती केंद्राच्या आऊट लेटमधून करण्यात येणार आहे, असा संदेश देण्यात आला. सदरील पाणी हे आपेगाव-हिरडपुरी बंधाºयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.४या वेळेनंतर पाणी स्थिर होईपर्यंत कोणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये किंवा आपली जनावरे, मालमत्ता नदीपात्रात घेऊन जाऊ नये, आपापल्या जीविताचे व मालमत्तेचे स्वसंरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.१४ गावे : गोदावरी नदीकाठावर १४ गावे असून यातील पैठण, पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, घेवरी, तळजापूर व हिरडपुरी आदी गावांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय २० गावांना अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.

टॅग्स :DamधरणelectricityवीजJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरी