शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 23:37 IST

खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शिवपूर वस्तीत पंधरा दिवसांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद आहे.

खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शिवपूर वस्तीत पंधरा दिवसांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे रहिवाशांना भटकंती करावी लागत असून, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागरमोर्चा काढण्यात आला. खामसवाडी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी जुनी एक टाकी आणि दोन विहिरी उपलब्ध आहेत. परंतु, वाढती लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध स्त्रोत अपुरे पडत असल्याने येथे नव्वद लाख रुपये खर्चून जलस्वराज योजना राबविण्यात आली. यातून शिवपूर येथे स्वतंत्र टाकी बांधण्यात आली. सध्या येथे पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. पाणीटंचाईला कंटाळून शनिवारी या भागातील महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंच सुमन कोकणे यांनी दोन दिवसात जलवाहिनीची दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)