शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाण्याची चोरी !

By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST

सुनील घोडके , खुलताबाद येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत.

सुनील घोडके , खुलताबाद खुलताबाद-फुलंब्री शहरासह २२ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत, याकडे जलसंपदा, तहसील प्रशासन, महावितरण कंपनी व खुलताबाद नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे, तर मुबलक पाणी असूनही खुलताबादकरांना तीन दिवसांआड अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने काही प्रमाणात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने गिरिजा प्रकल्पात बर्‍यापैकी पाणीसाठा झाला असून, मुबलक पाणी असूनही खुलताबाद नगर परिषद वर्षभरापासून जपून, काटकसरीने खुलताबादकरांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करीत आहे. महावितरण कंपनी विजेचे बिल न भरल्यास सर्वसामान्य माणसाची वीज खंडित करते. प्रकल्पात मात्र दिवसाढवळ्या विजेच्या खांबांवर आकडे टाकून विजेबरोबरच पाण्याचीही चोरी होत आहे, याबाबत महावितरण कंपनीस माहिती असूनही कारवाई केली जात नाही. गिरिजा प्रकल्पात पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी व पाईपलाईन टाकण्यात आली असून, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. प्रकल्पातून खुलताबाद शहरासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये ठिकठिकाणी व्हॉल्व व पाईपमधून पाण्याची गळती होत असून, या ठिकाणी महिला कपडेही धूत आहेत. नगर परिषदेने पाण्याची होणारी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा करा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव गिरिजा मध्यम प्रकल्पात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असूनही नगर परिषद खुलताबादकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करते. प्रकल्पात मुबलक पाणी असूनही नगर परिषदेचे धोरण जनतेविरुद्ध असल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे शेतीसाठी पाण्याची चोरी होत असताना तहसील प्रशासन व नगर परिषद शांत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध खुलताबाद येथे येणारे पाणी प्रथम जलशुद्धीकरण केंद्रात येऊन या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते; मात्र जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध आहे. या केंद्राकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने येथील तुरटी विरघळविण्याची मशिनरी बंद असून, धरणातून येणार्‍या पाण्यातच तुरटी टाकली जाते. पाण्यावरच मोठ्या प्रमाणावर घाण व कचरा जमा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांची संख्याही कमी असून, कधी कधी तुरटीऐवजी मीठ टाकून पाणी शुद्ध केले जाते. तसेच पाण्याच्या टाक्याही वेळोवेळी साफ केल्या जात नसल्याने खुलताबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्याधिकारी असून ताप, नसून अडचण खुलताबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सविता हारकर या रुजू झाल्यापासून त्यांनी कधी शहरातील समस्या बघण्यासाठी फेरफटका मारला नाही. कार्यालयात बसूनच कारभार हाकत आहेत. त्यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने शहरातील समस्येत वाढ झाली आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रावर सुरू असलेला प्रकार हा त्याचे उत्तम उदाहरण होय. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.