शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाण्याची चोरी !

By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST

सुनील घोडके , खुलताबाद येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत.

सुनील घोडके , खुलताबाद खुलताबाद-फुलंब्री शहरासह २२ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत, याकडे जलसंपदा, तहसील प्रशासन, महावितरण कंपनी व खुलताबाद नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे, तर मुबलक पाणी असूनही खुलताबादकरांना तीन दिवसांआड अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने काही प्रमाणात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने गिरिजा प्रकल्पात बर्‍यापैकी पाणीसाठा झाला असून, मुबलक पाणी असूनही खुलताबाद नगर परिषद वर्षभरापासून जपून, काटकसरीने खुलताबादकरांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करीत आहे. महावितरण कंपनी विजेचे बिल न भरल्यास सर्वसामान्य माणसाची वीज खंडित करते. प्रकल्पात मात्र दिवसाढवळ्या विजेच्या खांबांवर आकडे टाकून विजेबरोबरच पाण्याचीही चोरी होत आहे, याबाबत महावितरण कंपनीस माहिती असूनही कारवाई केली जात नाही. गिरिजा प्रकल्पात पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी व पाईपलाईन टाकण्यात आली असून, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. प्रकल्पातून खुलताबाद शहरासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये ठिकठिकाणी व्हॉल्व व पाईपमधून पाण्याची गळती होत असून, या ठिकाणी महिला कपडेही धूत आहेत. नगर परिषदेने पाण्याची होणारी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा करा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव गिरिजा मध्यम प्रकल्पात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असूनही नगर परिषद खुलताबादकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करते. प्रकल्पात मुबलक पाणी असूनही नगर परिषदेचे धोरण जनतेविरुद्ध असल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे शेतीसाठी पाण्याची चोरी होत असताना तहसील प्रशासन व नगर परिषद शांत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध खुलताबाद येथे येणारे पाणी प्रथम जलशुद्धीकरण केंद्रात येऊन या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते; मात्र जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध आहे. या केंद्राकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने येथील तुरटी विरघळविण्याची मशिनरी बंद असून, धरणातून येणार्‍या पाण्यातच तुरटी टाकली जाते. पाण्यावरच मोठ्या प्रमाणावर घाण व कचरा जमा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांची संख्याही कमी असून, कधी कधी तुरटीऐवजी मीठ टाकून पाणी शुद्ध केले जाते. तसेच पाण्याच्या टाक्याही वेळोवेळी साफ केल्या जात नसल्याने खुलताबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्याधिकारी असून ताप, नसून अडचण खुलताबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सविता हारकर या रुजू झाल्यापासून त्यांनी कधी शहरातील समस्या बघण्यासाठी फेरफटका मारला नाही. कार्यालयात बसूनच कारभार हाकत आहेत. त्यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने शहरातील समस्येत वाढ झाली आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रावर सुरू असलेला प्रकार हा त्याचे उत्तम उदाहरण होय. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.