शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाण्याची चोरी !

By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST

सुनील घोडके , खुलताबाद येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत.

सुनील घोडके , खुलताबाद खुलताबाद-फुलंब्री शहरासह २२ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात अवैधरीत्या विद्युत मोटारी लावून, तसेच आकडे टाकून काही शेतकरी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करीत आहेत, याकडे जलसंपदा, तहसील प्रशासन, महावितरण कंपनी व खुलताबाद नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे, तर मुबलक पाणी असूनही खुलताबादकरांना तीन दिवसांआड अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने काही प्रमाणात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने गिरिजा प्रकल्पात बर्‍यापैकी पाणीसाठा झाला असून, मुबलक पाणी असूनही खुलताबाद नगर परिषद वर्षभरापासून जपून, काटकसरीने खुलताबादकरांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करीत आहे. महावितरण कंपनी विजेचे बिल न भरल्यास सर्वसामान्य माणसाची वीज खंडित करते. प्रकल्पात मात्र दिवसाढवळ्या विजेच्या खांबांवर आकडे टाकून विजेबरोबरच पाण्याचीही चोरी होत आहे, याबाबत महावितरण कंपनीस माहिती असूनही कारवाई केली जात नाही. गिरिजा प्रकल्पात पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी व पाईपलाईन टाकण्यात आली असून, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. प्रकल्पातून खुलताबाद शहरासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये ठिकठिकाणी व्हॉल्व व पाईपमधून पाण्याची गळती होत असून, या ठिकाणी महिला कपडेही धूत आहेत. नगर परिषदेने पाण्याची होणारी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा करा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव गिरिजा मध्यम प्रकल्पात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असूनही नगर परिषद खुलताबादकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करते. प्रकल्पात मुबलक पाणी असूनही नगर परिषदेचे धोरण जनतेविरुद्ध असल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे शेतीसाठी पाण्याची चोरी होत असताना तहसील प्रशासन व नगर परिषद शांत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध खुलताबाद येथे येणारे पाणी प्रथम जलशुद्धीकरण केंद्रात येऊन या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते; मात्र जलशुद्धीकरण केंद्रच अशुद्ध आहे. या केंद्राकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने येथील तुरटी विरघळविण्याची मशिनरी बंद असून, धरणातून येणार्‍या पाण्यातच तुरटी टाकली जाते. पाण्यावरच मोठ्या प्रमाणावर घाण व कचरा जमा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांची संख्याही कमी असून, कधी कधी तुरटीऐवजी मीठ टाकून पाणी शुद्ध केले जाते. तसेच पाण्याच्या टाक्याही वेळोवेळी साफ केल्या जात नसल्याने खुलताबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्याधिकारी असून ताप, नसून अडचण खुलताबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सविता हारकर या रुजू झाल्यापासून त्यांनी कधी शहरातील समस्या बघण्यासाठी फेरफटका मारला नाही. कार्यालयात बसूनच कारभार हाकत आहेत. त्यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने शहरातील समस्येत वाढ झाली आहे. खुलताबादचे जलशुद्धीकरण केंद्रावर सुरू असलेला प्रकार हा त्याचे उत्तम उदाहरण होय. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.