शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले नाशिक येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: February 8, 2016 00:14 IST

हसनाबाद : परिसरात सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून आलेल्या २५ शेतकऱ्यांंना याचा फटका बसला आहे.

हसनाबाद : परिसरात सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून आलेल्या २५ शेतकऱ्यांंना याचा फटका बसला आहे. हसनाबाद परिसरातील जमीन कांदा लागवडीसाठी चांगली असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक शेत एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. परंतु अपुऱ्या पाण्यामुळे कांदा पीक धोक्यात आल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.नाशिक परिसरात खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी पातळी खालावली होती. त्याचा फटका रबीतील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांकडे कांदा पिकांचे लाखो रुपयांचे रोपे तयार होती. परंतु पाण्याअभावी रोपांची लागवड शेतकऱ्यांना करता आली नाही. भोकरदन तालुक्यातील जमीन कांदा पिकासाठी चांगली असल्याने आम्ही घरदार सोडून दोन महिन्यांपासून हसनाबाद परिसरात येऊन कांदा पिकाची लागवड केली. यासाठी लाखो रूपयांचा खर्च आल्याचे शेतकरी गोरख उंडे यांनी सांगितले. पिकाला दीड महिना पाणी मिळाले. परंतु पीक जोमात येण्यासाठी सध्या कांदा पिकाला पाण्याची गरज आहे. परंतु परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळीने तळ गाठल्याने दोनशे एकर वरील कांदा पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिसरातील लतीफपूर, सिरसगाव वाघु्रळ, वेटा, बोरगाव खडस, घोसेगाव आदी परिसरात बटईने शेती करून कांद्याची लागवड करण्यात आली. परंतु आत्ता पाण्याअभावी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणल्याचे येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथील शेतकरी रतीलाल तुळशीराम उंडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. कांदा शेतकरी संकटात सापडल्याने प्रशासनाने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)