शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

पाणीप्रश्नामुळे व्यावसायिक हैराण !

By admin | Updated: May 2, 2017 23:38 IST

उस्मानाबाद पाण्याचा पुरवठा होत नाही़ शिवाय अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी रस्त्यावरील पथदिवे बंद पडत आहेत़ तर इतर समस्याही समोर येत असल्याने उद्योजक हैराण झाले

विजय मुंडे  उस्मानाबादउस्मानाबादसह जिल्ह्यातील एमआयडीसीत मोजक्याच प्रमाणात उद्योग सुरू आहेत़ असे असले तरी या उद्योगांना सध्या मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही़ शिवाय अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी रस्त्यावरील पथदिवे बंद पडत आहेत़ तर इतर समस्याही समोर येत असल्याने उद्योजक हैराण झाले असून, नवीन उद्योजकही असुविधांमुळे उद्योग सुरू करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे़उस्मानाबाद, भूम, कळंब व उमरगा येथील एमआयडीसीत मोजकेच उद्योग सुरू आहेत़ या उद्योगामुळे परिसरातील मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे़ उस्मानाबादेतील एमआयडीसी ही रेल्वे स्थानक व विमान तळापासून जवळच आहे़ शिवाय शहराच्या नजीक हे क्षेत्र असल्याने बाजारपेठेत माल नेण्यासाठी उद्योजकांची गैरसोय होत नाही़ असे असले तरी या परिसरात असलेल्या महामंडळाच्या कुपनलिका सध्या उचक्या मारत आहेत़ कुपनलिकांचे पाणी अपुरे पडत असल्याने अनेक व्यवसायिकांना विकतचे पाणी आणून उद्योग चालवावे लागत आहेत़ तर पालिकेकडून पाणी घेतले जात असले तरी ते मुबलक प्रमाणात मिळत नाही़ पाण्याशिवाय रात्रीच्यावेळी बंद पडणारे पथदिवे हा ही येथील एक गंभीर प्रश्न बनला आहे़ येथील एमआयडीसीतील अंतर्गत भागातील काही रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी उद्योजकांमधून केली जात आहे़ कळंब येथील एमआयडीसीसाठी पालिकेकडूनच पाणी घेतले जाते़ असे असले तरी उन्हाळयातील टंचाईमुळे येथील उद्योजकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही़ भूम येथील एमआयडीसी भागातील रस्ते वीज, टेलिफोन आदी प्रश्न मागील काही वर्षात सुटले आहेत़ असे असले तरी येथेही पाणी हाच प्रमुख प्रश्न असल्याचे दिसून येते़ कळंब येथील परिस्थितीही अशीच आहे़ तर उमरगा येथील उद्योगांसाठी पाणी हे पालिकेकडून घेण्याचे नियोजन आहे़ मात्र, मुबलक पाणी मिळत नसल्याने उद्योजकांना विकतच पाणी घ्यावे लागते.