शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

जल संवर्धनाचा लातूर पॅर्टन व्हावा

By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST

लातूर : लातूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्याच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळवून देशपातळीवरही नावलौकिक मिळवला आहे़

लातूर : लातूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्याच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळवून देशपातळीवरही नावलौकिक मिळवला आहे़ असाच ‘लातूर पॅटर्न’ जल संवर्धनाचा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी मंगळवारी येथे केले़ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जनजागृती सप्ताह निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजनाअंतर्गत ‘जल है तो कल है’ ही विशेष कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती़ यावेळी जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील मार्गदर्शन करीत होत्या़ यावेळी मंचावर समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, बांधकाम सभापती सपना घुगे पाटील, जि़प सदस्य राजेसाहेब सवाई , मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, प्रायमो पुणेचे सचिन हतागळे, विभागीय समन्वयक अरूण रसाळ, पाणी व सच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी यांची उपस्थिती होती़ प्रतिभा पाटील म्हणाल्या, जिल्ह्यात सर्वत्रच पाणीटंचाई जाणवत आहे़ या पाणीटंचाईला आपण सर्वजण जबाबदार आहेत़ जमिनीतून पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होत आहे़ पडलेला पाऊस, सांडलेले पाणी, नदी-नाल्याच्या माध्यमातून वाहून जात आहे़ ते जमिनीत मुरले जात नाही़ त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच जलसंवर्धनाचे महत्व ओळखून सर्व नागरिकांनी जलसंवर्धनात लातूर पॅटर्न निर्माण करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)भविष्यात पाण्यासाठी युध्द होतील, असे एका विचारवंताने भविष्यवाणी केली होती़ ही भविष्यवाणी खरी ठरेल की काय, असे वाटत आहे़ देशात व राज्यात पाणीटंचाईच्या झळा नागरीक सोसताना दिसून येत आहेत़ या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, सर्वांनी पडलेल्या पावसाचे पाणी व वापर करून टाकलेले पाणी तसेच वाहून जाणारे पाणी हे जमिनीत जिरवले पाहिजे़