शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पाणी समित्या रडारवर !

By admin | Updated: January 5, 2015 00:39 IST

बीड : जिल्ह्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला..! हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती नित्याची...! अशा साऱ्या बिकट स्थितीत पाणीयोजनांचा पैसा उचलून कामे अर्धवट ठेवत

बीड : जिल्ह्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला..! हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती नित्याची...! अशा साऱ्या बिकट स्थितीत पाणीयोजनांचा पैसा उचलून कामे अर्धवट ठेवत अख्ख्या गावाला पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या समित्यांविरुद्ध आता धडक कारवाया करण्यात येणार आहेत. गेवराई उपविभागाने १५ समित्यांना अंतिम नोटिसा बजावून अध्यक्ष, सचिवांविरुद्ध थेट गुन्हे नोंदविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या समित्यांनी सुमारे ९५ लाख ३२ हजार ७५३ रुपये इतकी रक्कम अखर्चीत ठेवली आहे.२०१२-१३ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत राबविलेल्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यवधीचा निधी आला होता. मात्र, काही समित्यांनी योजनेसाठी आलेला निधी बँक खात्यातून परस्पर उचलला. हा निधी योजनेवर खर्च करण्याऐवजी तो खासगी कामासाठी वापरला. त्यामुळे शेकडो योजना अपूर्ण राहिल्या. एकीकडे दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही. पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट ठरलेलीच आहे. पाणीटंचाईची स्थिती बिकट असताना योजना राबविणाऱ्यांनी मात्र, योजनेचा पैसा बँकेतून उचलून खासगी कामासाठी खर्च केला. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नोटिसा पाठवून त्यांना निधीचा गैरवापर न करता कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. या नोटिसांनाही काही समित्यांनी दाद दिली नाही. संधी देऊनही समित्या ताळ्यावर आल्या नाहीत. त्यामुळे आता समित्यांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायद्याचा फास घट्ट केला जाणार आहे. त्यासाठी गेवराई तालुक्यातील १५ समित्यांना उपविभागीय अभियंता पी. जी. जोगदंड यांनी अंतिम नोटिसा धाडून गुन्हे नोंदवण्याची तंबी दिली आहे. आता गय नाही!योजनेचा हातावर पैसा हातावर ठेवणे हा अपहारच आहे. त्यामुळे आता पैसे उचलून कामे अपूर्ण ठेवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण यांनी सांगितले.योजनांचा पैसा हातावर ठेवणाऱ्या जिल्ह्यातील ३७ समित्यांविरुद्ध यापूर्वीच गुन्हे नोंद झालेले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालिन कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बडगा उगारला होता. त्यांच्या बदलीनंतर कारवाया थंड पडल्या होत्या. आता पुन्हा एकदा कारवायांना गती येणार आहे.