शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उपसा रोखला, २७० विद्युत कनेक्शन तोडले !

By admin | Updated: July 7, 2014 00:13 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे. ३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आरक्षित करण्यासंदर्भात महसूल प्रशासन व पाटबंधारे विभागांना तातडीच्या सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘आरक्षित पाण्याचा उपसा सुरू’ या मथळ्याखाली रविवारी वृत्त प्रकाशित केले होते. तसेच विविध ठिकाणच्या प्रकल्पावर सुरू असलेल्या विद्युत मोटारी ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे प्रशासनास दाखवून दिले. या संदर्भात खडबडून जागे झालेल्या महसूल व महावितरणने रविवारी दिवसभरात २७० विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडले आहेत.लातूर जिल्ह्यात यावर्षी जून लोटला तरी पाऊस पडला नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक आहे, अशा ठिकाणचे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी तातडीची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी ३ जुलै रोजी सर्व विभागांना दिली होती. तातडीच्या सूचना देऊनही महसूल प्रशासन व महावितरणने याकडे दुर्लक्ष केले होते. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतीसाठी दिवसेंदिवस मोठा उपसा होत असल्याने पाणीपातळी घटत होती. रविवारी औसा तालुक्यातील उटी (बु.) येथील तावरजा प्रकल्पावरील ७०, जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी येथील प्रकल्पावरील १०० मोटारींचे विद्युत कनेक्शन महावितरणने तोडले आहेत. तसेच चाकूर तालुक्यातील बोथी प्रकल्पावर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना एक दिवसाची मुदत दिली आहे. २५० मोटारींचा पुरवठा खंडित...जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी प्रकल्पावर शेकडो मोटारींतून शेतकऱ्यांनी पाणी उपसा सुरू केला होता. दिवसेंदिवस पाणीसाठा घटत असल्याने प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करूनही विद्युतपंपाचे कनेक्शन तोडण्यात आले नव्हते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने रविवारी ढोरसांगवी प्रकल्पावरील विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडण्याच्या सूचना केल्यानंतर महावितरणच्या पथकाने २५० मोटारींचे कनेक्शन तोडले आहेत.जळकोट तालुक्यात २५० मोटारींचे वीज कनेक्शन तोडून ६० विद्युत मोटारी बाजूला काढण्यात आल्या आहेत.जप्तीचे आदेश...चाकूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी बोथी प्रकल्पावर सुरू असलेल्या मोटारी बंद करण्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना रविवारी सूचना केल्या आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी व बोथी येथील पोलिस पाटलाने प्रकल्पावरील मोटारींची पाहणी केली आहे. सोमवारी सर्व शेतकऱ्यांनी आपले विद्युतपंप काढून घ्यावेत, अशा सूचनाही तलाठ्याने दिल्या आहेत. त्यानंतरही प्रकल्पावर पंप आढळून आल्यास जप्त करण्यात येणार आहेत.६ जनित्रांचा पुरवठा खंडित...औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पावर असलेल्या सहा जनित्रांचा रविवारी सकाळी विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. तहसीलदार दत्ता भारस्कर, नगरपालिका, सिंचन विभागाने कारवाई संदर्भात महावितरणकडे पत्र दिले होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच रविवारी सकाळपासूनच महसूल यंत्रणा कामाला लागली. तहसीलदारांनी बैठक घेऊन मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच व्हावा. शेतीसाठी होणारा वापर तात्काळ थांबवावा, असे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. उपअभियंता एम.एन. घारोळे, कनिष्ठ अभियंता आर.एम. काळे म्हणाले, महावितरणच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. जवळपास ७० विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले आहेत.