शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

३५ गावांना पाणीटंचाईच्या झळा तीव्र

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

लातूर : पावसाळा सुरु होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाने बरसात केली नसल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़

लातूर : पावसाळा सुरु होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाने बरसात केली नसल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ सध्या जिल्ह्यातील ३५ गावे अधिग्रहणा प्रतिक्षेत आहेत़ ६ गावांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून लातूर आणि अहमदपूर या दोन तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी जाणवत असली तरी उन्हाच्या चटक्यांनी अबालवृध्द होरपळून निघाले आहेत़ त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांस पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील शेतीची कामे आटोपली आहेत़ मृग नक्षत्र निघून आठवडाभराचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे़ तीव्र उन्हामुळे जलस्त्रोतही आटत असल्याने दिवसेंदिवस पाण्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत़ जिल्ह्यातील ७८ गावे आणि ९ वाड्यांना १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्याचबरोबर ५ गावे आणि एका वाडीस ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ तीव्र उन्हामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे़ परिणामी अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ सध्या लातूर तालुक्यातील सारसा, रामेगाव तांडा, चिंचोली ब़, अहमदपूर तालुक्यातील परंचडा, देवकरा, उदगीर तालुक्यातील सोमला/ काहिमराम तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ चाकूर आणि देवणी या दोन तालुक्यांत मात्र अजूनही टँकर सुरू नसल्याचे दिसून येत आहे़ त्यापाठोपाठ जळकोटमध्येही पाणीटंचाई कमी जाणवत आहे़ जिल्ह्यातील ११६ गावे आणि ९ वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असली तरी त्यापैकी ११३ गावे आणि ९ वाड्यांनी प्रस्ताव सादर केला़ त्यातील ७८ गावाांचे आणि सर्व वाड्यांचे प्रस्ताव मंजूर करुन १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.