लातूर : पावसाळा सुरु होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाने बरसात केली नसल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ सध्या जिल्ह्यातील ३५ गावे अधिग्रहणा प्रतिक्षेत आहेत़ ६ गावांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून लातूर आणि अहमदपूर या दोन तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी जाणवत असली तरी उन्हाच्या चटक्यांनी अबालवृध्द होरपळून निघाले आहेत़ त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांस पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील शेतीची कामे आटोपली आहेत़ मृग नक्षत्र निघून आठवडाभराचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे़ तीव्र उन्हामुळे जलस्त्रोतही आटत असल्याने दिवसेंदिवस पाण्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत़ जिल्ह्यातील ७८ गावे आणि ९ वाड्यांना १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्याचबरोबर ५ गावे आणि एका वाडीस ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ तीव्र उन्हामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे़ परिणामी अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ सध्या लातूर तालुक्यातील सारसा, रामेगाव तांडा, चिंचोली ब़, अहमदपूर तालुक्यातील परंचडा, देवकरा, उदगीर तालुक्यातील सोमला/ काहिमराम तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ चाकूर आणि देवणी या दोन तालुक्यांत मात्र अजूनही टँकर सुरू नसल्याचे दिसून येत आहे़ त्यापाठोपाठ जळकोटमध्येही पाणीटंचाई कमी जाणवत आहे़ जिल्ह्यातील ११६ गावे आणि ९ वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असली तरी त्यापैकी ११३ गावे आणि ९ वाड्यांनी प्रस्ताव सादर केला़ त्यातील ७८ गावाांचे आणि सर्व वाड्यांचे प्रस्ताव मंजूर करुन १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
३५ गावांना पाणीटंचाईच्या झळा तीव्र
By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST