शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

३५ गावांना पाणीटंचाईच्या झळा तीव्र

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

लातूर : पावसाळा सुरु होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाने बरसात केली नसल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़

लातूर : पावसाळा सुरु होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाने बरसात केली नसल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ सध्या जिल्ह्यातील ३५ गावे अधिग्रहणा प्रतिक्षेत आहेत़ ६ गावांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून लातूर आणि अहमदपूर या दोन तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी जाणवत असली तरी उन्हाच्या चटक्यांनी अबालवृध्द होरपळून निघाले आहेत़ त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांस पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील शेतीची कामे आटोपली आहेत़ मृग नक्षत्र निघून आठवडाभराचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे़ तीव्र उन्हामुळे जलस्त्रोतही आटत असल्याने दिवसेंदिवस पाण्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत़ जिल्ह्यातील ७८ गावे आणि ९ वाड्यांना १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्याचबरोबर ५ गावे आणि एका वाडीस ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ तीव्र उन्हामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे़ परिणामी अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ सध्या लातूर तालुक्यातील सारसा, रामेगाव तांडा, चिंचोली ब़, अहमदपूर तालुक्यातील परंचडा, देवकरा, उदगीर तालुक्यातील सोमला/ काहिमराम तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ चाकूर आणि देवणी या दोन तालुक्यांत मात्र अजूनही टँकर सुरू नसल्याचे दिसून येत आहे़ त्यापाठोपाठ जळकोटमध्येही पाणीटंचाई कमी जाणवत आहे़ जिल्ह्यातील ११६ गावे आणि ९ वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असली तरी त्यापैकी ११३ गावे आणि ९ वाड्यांनी प्रस्ताव सादर केला़ त्यातील ७८ गावाांचे आणि सर्व वाड्यांचे प्रस्ताव मंजूर करुन १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.