शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By बापू सोळुंके | Updated: September 22, 2024 21:50 IST

मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील जायकवाडी प्रकल्प ९९.४५ टक्केपेक्षा अधिक भरला आहे. शिवाय पुढील काही दिवस पावसाचे असल्याने जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात कडा प्रशासनाने घेतला. यापार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा रविवारी रात्री दिला आहे. 

 मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लहान, मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहे. या दोन्ही जिल्ह्यात आता पावसाचे नवीन थेंब साठविणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे उर्ध्वभागात पाऊस होताच सर्व पाणी गोदापात्राद्वारे जायकवाडी प्रकल्पात येणार आहे. आज जायकवाडी प्रकल्पात ९९.५० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला. गोदावरी नदी काठच्या गावातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.यापूर्वी १२ दिवस उघडले होते जायकवाडीचे दरवाजेयापूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे टप्प्या,टप्प्याने १२ दरवाजे उघडले होते. तेव्हा ९ हजार ८०० क्युसेक क्षमतेने गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते. नंतर टप्प्या,टप्याने धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील गंगापुर,वैजापुर तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शिवाय रिमझिम पाऊसही पडत आहे. प्रकल्प शंभर टक्के भरत आल्याने प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन गोदाकाठच्या गावांत कोणतीही हाणी होऊ नये, यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ---समाधान सब्बीनवार. प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण