शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By बापू सोळुंके | Updated: September 22, 2024 21:50 IST

मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील जायकवाडी प्रकल्प ९९.४५ टक्केपेक्षा अधिक भरला आहे. शिवाय पुढील काही दिवस पावसाचे असल्याने जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात कडा प्रशासनाने घेतला. यापार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा रविवारी रात्री दिला आहे. 

 मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लहान, मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहे. या दोन्ही जिल्ह्यात आता पावसाचे नवीन थेंब साठविणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे उर्ध्वभागात पाऊस होताच सर्व पाणी गोदापात्राद्वारे जायकवाडी प्रकल्पात येणार आहे. आज जायकवाडी प्रकल्पात ९९.५० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला. गोदावरी नदी काठच्या गावातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.यापूर्वी १२ दिवस उघडले होते जायकवाडीचे दरवाजेयापूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे टप्प्या,टप्प्याने १२ दरवाजे उघडले होते. तेव्हा ९ हजार ८०० क्युसेक क्षमतेने गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते. नंतर टप्प्या,टप्याने धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील गंगापुर,वैजापुर तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शिवाय रिमझिम पाऊसही पडत आहे. प्रकल्प शंभर टक्के भरत आल्याने प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन गोदाकाठच्या गावांत कोणतीही हाणी होऊ नये, यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ---समाधान सब्बीनवार. प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण