शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
3
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
4
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
5
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
6
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
7
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
8
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
9
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
10
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
11
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
12
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
13
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
14
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
15
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
16
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
17
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
18
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
19
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
20
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By बापू सोळुंके | Updated: September 22, 2024 21:50 IST

मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील जायकवाडी प्रकल्प ९९.४५ टक्केपेक्षा अधिक भरला आहे. शिवाय पुढील काही दिवस पावसाचे असल्याने जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात कडा प्रशासनाने घेतला. यापार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा रविवारी रात्री दिला आहे. 

 मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लहान, मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहे. या दोन्ही जिल्ह्यात आता पावसाचे नवीन थेंब साठविणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे उर्ध्वभागात पाऊस होताच सर्व पाणी गोदापात्राद्वारे जायकवाडी प्रकल्पात येणार आहे. आज जायकवाडी प्रकल्पात ९९.५० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला. गोदावरी नदी काठच्या गावातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.यापूर्वी १२ दिवस उघडले होते जायकवाडीचे दरवाजेयापूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे टप्प्या,टप्प्याने १२ दरवाजे उघडले होते. तेव्हा ९ हजार ८०० क्युसेक क्षमतेने गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते. नंतर टप्प्या,टप्याने धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील गंगापुर,वैजापुर तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शिवाय रिमझिम पाऊसही पडत आहे. प्रकल्प शंभर टक्के भरत आल्याने प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन गोदाकाठच्या गावांत कोणतीही हाणी होऊ नये, यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ---समाधान सब्बीनवार. प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण