शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

सांडपाणी प्रक्रिया शेतीसाठी वरदान ठरेल

By admin | Updated: June 5, 2016 00:34 IST

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतूने कृतीशिल आहेत. राज्यातील देवस्थाने, पवित्र नद्या, यांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतूने कृतीशिल आहेत. राज्यातील देवस्थाने, पवित्र नद्या, यांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. ५ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या पर्यावरण दिन व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधून शासन व उद्योगपतींच्या सहभागातून जालना शहर व कुंडलिका नदी परिसरातील एक कोटी निरुपयोगी पाणी एकत्र करुन त्यावर प्रक्रि या करुन ते पाणी ग्रामीण भागातील शेतीला वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी व शासकीय विश्रामगृह ४८८ येथे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन याबाबत उद्योगपती व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधींची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, उद्योगपती राम भोगले, विवेक देशपांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विलास नाईक, भाऊसाहेब कदम, गोपाळराव बोराडे, घनश्याम गोयल, सुनिल रायठठ्ठा, किशोर अग्रवाल, विरेंद्र धोका उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शहरातील प्रक्रिया केलेले सांडपाणी परिसरातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयुक्त असून, अशा प्रकारचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी तात्काळ जिल्हाधिकारी यांना याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत राम भोगले यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)