शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

कचऱ्याची समस्या कायम

By admin | Updated: May 6, 2017 00:15 IST

उस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे. पालिकेच्या या यशाबद्दल कौतुक होत असले तरी शहरातील अनेक भागात आजही कचऱ्याचे ढिगारे जैसे थे असल्याने पुर्नार्थाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. देशातील स्वच्छ शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत २१९ वा क्रमांक पटकावित मराठवाड्यात नांदेडनंतर उस्मानाबादने बाजी मारली आहे. या यादीत मराठवाड्यातील परभणी शहर २२९ व्या, उदगीर २४०, औरंगाबाद २९९, बीड ३०२, लातूर ३१८ तर जालना शहराचा क्रमांक १६८ असा आहे. मराठवाड्यातील इतर शहरांच्या तुलनेत उस्मानाबादने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. मात्र स्वच्छ शहराचा मिळालेला लौकीक कायम ठेवण्यासाठी आणखी परिश्रमाची आवश्यकता असल्याचेच शहराच्या विविध भागातील परिस्थिती सांगते.शहरातील मध्यवर्ती असलेल्या समता नगर, आनंदनगर तसेच रामनगरमधीलही प्रमुख रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसून येते. या भागातील कचराकुंड्या पालिकेने काही दिवसापूर्वी काढून टाकल्या आहेत. कचराकुंड्याबरोबरच शेजारी नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळेच कुंड्या काढल्यास घरातील कचरा नागरिक घरात साठवून घंटागाडीमध्ये देतील ही अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. अशीच परिस्थिती जिल्हा स्टेडियम ते पालिका कार्यालय या मार्गावर असल्याचे दिसते. या परिसरातील अनेक व्यापारी रस्त्याच्या बाजूला कचरा फेकतात. विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारीही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. गणेशनगर, खाजानगर या परिसरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता दिसून आली.