शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

कचऱ्याची समस्या कायम

By admin | Updated: May 6, 2017 00:15 IST

उस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे. पालिकेच्या या यशाबद्दल कौतुक होत असले तरी शहरातील अनेक भागात आजही कचऱ्याचे ढिगारे जैसे थे असल्याने पुर्नार्थाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. देशातील स्वच्छ शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत २१९ वा क्रमांक पटकावित मराठवाड्यात नांदेडनंतर उस्मानाबादने बाजी मारली आहे. या यादीत मराठवाड्यातील परभणी शहर २२९ व्या, उदगीर २४०, औरंगाबाद २९९, बीड ३०२, लातूर ३१८ तर जालना शहराचा क्रमांक १६८ असा आहे. मराठवाड्यातील इतर शहरांच्या तुलनेत उस्मानाबादने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. मात्र स्वच्छ शहराचा मिळालेला लौकीक कायम ठेवण्यासाठी आणखी परिश्रमाची आवश्यकता असल्याचेच शहराच्या विविध भागातील परिस्थिती सांगते.शहरातील मध्यवर्ती असलेल्या समता नगर, आनंदनगर तसेच रामनगरमधीलही प्रमुख रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसून येते. या भागातील कचराकुंड्या पालिकेने काही दिवसापूर्वी काढून टाकल्या आहेत. कचराकुंड्याबरोबरच शेजारी नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळेच कुंड्या काढल्यास घरातील कचरा नागरिक घरात साठवून घंटागाडीमध्ये देतील ही अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. अशीच परिस्थिती जिल्हा स्टेडियम ते पालिका कार्यालय या मार्गावर असल्याचे दिसते. या परिसरातील अनेक व्यापारी रस्त्याच्या बाजूला कचरा फेकतात. विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारीही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. गणेशनगर, खाजानगर या परिसरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता दिसून आली.