शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

कचऱ्याची समस्या कायम

By admin | Updated: May 6, 2017 00:15 IST

उस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे. पालिकेच्या या यशाबद्दल कौतुक होत असले तरी शहरातील अनेक भागात आजही कचऱ्याचे ढिगारे जैसे थे असल्याने पुर्नार्थाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. देशातील स्वच्छ शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत २१९ वा क्रमांक पटकावित मराठवाड्यात नांदेडनंतर उस्मानाबादने बाजी मारली आहे. या यादीत मराठवाड्यातील परभणी शहर २२९ व्या, उदगीर २४०, औरंगाबाद २९९, बीड ३०२, लातूर ३१८ तर जालना शहराचा क्रमांक १६८ असा आहे. मराठवाड्यातील इतर शहरांच्या तुलनेत उस्मानाबादने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. मात्र स्वच्छ शहराचा मिळालेला लौकीक कायम ठेवण्यासाठी आणखी परिश्रमाची आवश्यकता असल्याचेच शहराच्या विविध भागातील परिस्थिती सांगते.शहरातील मध्यवर्ती असलेल्या समता नगर, आनंदनगर तसेच रामनगरमधीलही प्रमुख रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसून येते. या भागातील कचराकुंड्या पालिकेने काही दिवसापूर्वी काढून टाकल्या आहेत. कचराकुंड्याबरोबरच शेजारी नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळेच कुंड्या काढल्यास घरातील कचरा नागरिक घरात साठवून घंटागाडीमध्ये देतील ही अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. अशीच परिस्थिती जिल्हा स्टेडियम ते पालिका कार्यालय या मार्गावर असल्याचे दिसते. या परिसरातील अनेक व्यापारी रस्त्याच्या बाजूला कचरा फेकतात. विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारीही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. गणेशनगर, खाजानगर या परिसरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता दिसून आली.