शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

यश मिळविण्यासाठी सकारात्मकता हवी.!

By admin | Updated: June 16, 2016 00:05 IST

जालना : दहावी परीक्षेत यश मिळाले म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी झालात असे नाही. खरे तर आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटनंतरच शुन्यातून नव्याने सुरुवात करावी लागते.

जालना : दहावी परीक्षेत यश मिळाले म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी झालात असे नाही. खरे तर आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटनंतरच शुन्यातून नव्याने सुरुवात करावी लागते. यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, स्वत:च्या क्षमता ओळखणे, जिद्द , परिश्रम आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या अन्सार शेख यांनी बुधवारी येथे विद्यार्थी व पालकांना दिला. जालना शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश राऊत व युवक शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री आ. राजेश टोपे, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, बबलू चौधरी, एकबाल पाशा, नूर खान, जयंत भोसले, नंदकिशोर चव्हाण, महिला आघाडीच्या शकुंतला कदम, शहराध्यक्षा शाजिया शेख, सुरेश खंडाळे, अशोक साबळे, मुख्याध्यापिका खमर सुलताना, मिर्झा अन्वर बेग आदी उपस्थित होते. अन्सार शेख म्हणाले, आपली स्पर्धा ही दुसऱ्याशी नाही तर स्वत:शी करा. आपल्यातील क्षमता ओळखा परिस्थितीचा उगाचच बाऊ करु नका. कुठलेही यश हे तुम्हाला नवी संधी उपलब्ध करुन देत असते. त्यामुळे यशानंतर जबाबदारी अधिक वाढते. कुणी सांगते म्हणून नाही तर तुमचे मन काय म्हणते ते ऐका. त्यानुसार करिअर घडविण्यासाठी ते क्षेत्र निवडा तरच तुम्ही यशस्वी व्हाल, असे त्यांनी सांगितले. भावनिक प्रज्ञा आणि गुणवत्तेचा विकास झाला तरच यश मिळते. नेहमी नवनवीन शिकायची उमेद राखा, आयुष्यात नेहमीच पाय जमिनीवर असू द्या, कुठलीही गोष्ट शंभर टक्के योगदान देऊन करा, तरच यश तुमचे होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले तरच जालना जिल्ह्यातून दरवर्षी एक तरी आयएएस अधिकारी तयार होईल, असा विश्वास अन्सार शेख यांनी व्यक्त केला. डॉ.निसार देशमुख, एकबाल पाशा यांचीही भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे राजेश राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले. सोहळ्यायाप्रसंगी सभागृह खचाखच भरले होते. छायाचित्र/२