शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

यश मिळविण्यासाठी सकारात्मकता हवी.!

By admin | Updated: June 16, 2016 00:05 IST

जालना : दहावी परीक्षेत यश मिळाले म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी झालात असे नाही. खरे तर आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटनंतरच शुन्यातून नव्याने सुरुवात करावी लागते.

जालना : दहावी परीक्षेत यश मिळाले म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी झालात असे नाही. खरे तर आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटनंतरच शुन्यातून नव्याने सुरुवात करावी लागते. यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, स्वत:च्या क्षमता ओळखणे, जिद्द , परिश्रम आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या अन्सार शेख यांनी बुधवारी येथे विद्यार्थी व पालकांना दिला. जालना शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश राऊत व युवक शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री आ. राजेश टोपे, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, बबलू चौधरी, एकबाल पाशा, नूर खान, जयंत भोसले, नंदकिशोर चव्हाण, महिला आघाडीच्या शकुंतला कदम, शहराध्यक्षा शाजिया शेख, सुरेश खंडाळे, अशोक साबळे, मुख्याध्यापिका खमर सुलताना, मिर्झा अन्वर बेग आदी उपस्थित होते. अन्सार शेख म्हणाले, आपली स्पर्धा ही दुसऱ्याशी नाही तर स्वत:शी करा. आपल्यातील क्षमता ओळखा परिस्थितीचा उगाचच बाऊ करु नका. कुठलेही यश हे तुम्हाला नवी संधी उपलब्ध करुन देत असते. त्यामुळे यशानंतर जबाबदारी अधिक वाढते. कुणी सांगते म्हणून नाही तर तुमचे मन काय म्हणते ते ऐका. त्यानुसार करिअर घडविण्यासाठी ते क्षेत्र निवडा तरच तुम्ही यशस्वी व्हाल, असे त्यांनी सांगितले. भावनिक प्रज्ञा आणि गुणवत्तेचा विकास झाला तरच यश मिळते. नेहमी नवनवीन शिकायची उमेद राखा, आयुष्यात नेहमीच पाय जमिनीवर असू द्या, कुठलीही गोष्ट शंभर टक्के योगदान देऊन करा, तरच यश तुमचे होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले तरच जालना जिल्ह्यातून दरवर्षी एक तरी आयएएस अधिकारी तयार होईल, असा विश्वास अन्सार शेख यांनी व्यक्त केला. डॉ.निसार देशमुख, एकबाल पाशा यांचीही भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे राजेश राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले. सोहळ्यायाप्रसंगी सभागृह खचाखच भरले होते. छायाचित्र/२