शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

औरंगाबादमधील सभेपासूनच राज्यभर ‘वंचित’ची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:50 IST

त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देओवेसी चार दिवस ठाण मांडून बसलेजबिंदा लॉन्सवरील जाहीर सभेचा प्रभाव

औरंगाबाद : औरंगाबाद ही खरं तर कार्यशाळाच होय. इथे केलेले प्रयोग यशस्वी होतात आणि नंतर ते महाराष्ट्रभर पसरतात. तसंच काहीसं एमआयएमचं व नंतर वंचित बहुजन आघाडीचं झालं. २०१४ साली प्रथमत:च एमआयएमने इथे विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही एमआयएमचे २५ नगरसेवक आले. 

२ आॅक्टोबर २०१८ रोजी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. आमदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा झाली आणि मुस्लिम व दलित समाजाचं झपाट्यानं धु्रवीकरण झालं. हे दोन्ही समाज एक झाले. 

असदोद्दीन ओवेसी यांनी दिले चार दिवसजलील यांचा प्रचार करण्यासाठी स्वत: असदोद्दीन ओवेसी हे औरंगाबाद मतदारसंघात तळ ठोकून होते. शहरात त्यांनी छोट्या- मोठ्या सभा घ्यायला सुरुवात केली. अनेक  मोहल्ल्यांमध्ये त्यांनी पदयात्रा केल्या. प्रतिसाद मिळत गेला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्यांनी शहरातील बुद्धिमंत व जाणकार कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

जबिंदा लॉन्सवरील बाळासाहेब आंबेडकरांची सभाप्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढण्याचा आणि जिंकण्याचा संकल्प केला होता, त्याच लॉन्सवर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची संयुक्त जाहीर सभा झाली. त्याच दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. परंतु त्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि वंचित बहुजन आघाडीच्या या सभेची तुलना केली असता, ‘वंचित’ची सभा किती तरी मोठी राहिली.

एकतर्फी मतदान...बाळासाहेब आणि असदोद्दीन ओवेसी यांच्यामुळे दलित आणि मुस्लिम समाज खूपच एकवटला गेला आणि एकतर्फी मतदान ज्याला म्हणतात, ती जलील यांना झाली आणि त्याचा परिणाम ते विजयी झाले. वंचित हा एक प्रयोग आहे. त्यात केवळ दलित आणि मुस्लिम हे दोनच समाज अपेक्षित नाहीत. तर ओबीसी, सूक्ष्म ओबीसी, भटके  विमुक्त, ज्यांच्यापर्यंत लोकशाहीची किरणे पोहोचलीच नाहीत, त्यांना या मूळ प्रवाहात आणण्याचा हा संघर्ष होता.

दिग्गज नेत्यांच्या सभेमुळे हवाऔरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा २ आॅक्टोबर २०१८ रोजी झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल