शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

औरंगाबादमधील सभेपासूनच राज्यभर ‘वंचित’ची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:50 IST

त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देओवेसी चार दिवस ठाण मांडून बसलेजबिंदा लॉन्सवरील जाहीर सभेचा प्रभाव

औरंगाबाद : औरंगाबाद ही खरं तर कार्यशाळाच होय. इथे केलेले प्रयोग यशस्वी होतात आणि नंतर ते महाराष्ट्रभर पसरतात. तसंच काहीसं एमआयएमचं व नंतर वंचित बहुजन आघाडीचं झालं. २०१४ साली प्रथमत:च एमआयएमने इथे विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही एमआयएमचे २५ नगरसेवक आले. 

२ आॅक्टोबर २०१८ रोजी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. आमदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा झाली आणि मुस्लिम व दलित समाजाचं झपाट्यानं धु्रवीकरण झालं. हे दोन्ही समाज एक झाले. 

असदोद्दीन ओवेसी यांनी दिले चार दिवसजलील यांचा प्रचार करण्यासाठी स्वत: असदोद्दीन ओवेसी हे औरंगाबाद मतदारसंघात तळ ठोकून होते. शहरात त्यांनी छोट्या- मोठ्या सभा घ्यायला सुरुवात केली. अनेक  मोहल्ल्यांमध्ये त्यांनी पदयात्रा केल्या. प्रतिसाद मिळत गेला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्यांनी शहरातील बुद्धिमंत व जाणकार कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

जबिंदा लॉन्सवरील बाळासाहेब आंबेडकरांची सभाप्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढण्याचा आणि जिंकण्याचा संकल्प केला होता, त्याच लॉन्सवर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची संयुक्त जाहीर सभा झाली. त्याच दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. परंतु त्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि वंचित बहुजन आघाडीच्या या सभेची तुलना केली असता, ‘वंचित’ची सभा किती तरी मोठी राहिली.

एकतर्फी मतदान...बाळासाहेब आणि असदोद्दीन ओवेसी यांच्यामुळे दलित आणि मुस्लिम समाज खूपच एकवटला गेला आणि एकतर्फी मतदान ज्याला म्हणतात, ती जलील यांना झाली आणि त्याचा परिणाम ते विजयी झाले. वंचित हा एक प्रयोग आहे. त्यात केवळ दलित आणि मुस्लिम हे दोनच समाज अपेक्षित नाहीत. तर ओबीसी, सूक्ष्म ओबीसी, भटके  विमुक्त, ज्यांच्यापर्यंत लोकशाहीची किरणे पोहोचलीच नाहीत, त्यांना या मूळ प्रवाहात आणण्याचा हा संघर्ष होता.

दिग्गज नेत्यांच्या सभेमुळे हवाऔरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा २ आॅक्टोबर २०१८ रोजी झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल