शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

घराची भिंत कोसळून वृद्धा जागीच ठार

By admin | Updated: September 26, 2016 00:04 IST

तामलवाडी : सलग चार तास पडलेल्या दमदार पावसाने घराची भिंत कोसळून वृद्धा जागीच ठार, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

तासगाव : सांगली येथे २७ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी तासगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने जोरदार कंबर कसली आहे. तालुक्यातील गावन् गाव मराठामय झाल्याचे चित्र आहे. गावा-गावात बैठकांचा धडाका सुरु असून, मोर्चाची जय्यत तयारी केली जात आहे. या मोर्चासाठी अनेक जाती-धर्माच्या संघटनांकडून पाठिंबा दिला जाता असून, मोर्चासाठी अनेक संस्थांकडून सुटी जाहीर केली जात आहे. सांगली येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावा-गावात बैठका घेण्यात येत आहेत. यासाठी शहरातील तरुण प्रमुख पदाधिकाऱ्यांचे विविध चार संघ तयार करण्यात आले आहेत. हे संघ क्रांती मोर्चाचे महत्त्व, काम, उद्देश याबाबत माहिती देण्याचे काम करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज चार ते पाच गावात हे संघ जाऊन याबाबत बैठका घेत आहेत. बहुतांश गावांतून या बैठका झाल्या असून बैठकीसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात मराठामय वातावरण तयार झाले आहे. तसेच या बैठकांमधून आर्थिक मदतीची घोषणा केली जात आहे. प्रत्येक बैठकीला आठ ते दहा हजार रुपयांची मदत जमा होत असल्याचे सांगण्यात आले. मराठी क्रांती मोर्चाला तासगाव तालुक्यातील मुस्लिम समाज, लिंंगायत समाज, माळी समाज, गुरव समाज, जैन समाज, तसेच घिसाडी समाजाच्यावतीने पाठिंंबा देण्यात आला आहे. मोर्चासाठी जाणाऱ्या लोकांना तासगाव ते सांगली मार्गावर विविध समाज तसेच गावांतून पाण्याच्या बाटल्या, सरबत, चहा, नाष्टा वाटप करण्यात येणार आहे. तासगाव येथील विटा नाका तसेच चिंंचणी नाका येथे मुस्लिम समाजाच्यावतीने पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र या बाटल्या कोठेही अन्यत्र न फेकता कचराकुंडीतच टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील वर्गा-वर्गात जाऊन आयोजकांनी या मोर्चाचे महत्त्व तसेच जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचा मोठा पाठिंंबा मिळत असल्याचे सांगितले. तासगावहून सांगली येथे जाण्यासाठी विशेषत: महिलांच्या सोयीसाठी तासगावमधून अनेक वडापचालक तसेच मालवाहतूक संघटना आपली वाहने चौका-चौकात उभी करणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. मोर्चासाठी तालुक्यातील प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते आणि वकील यांचे संघ तयार करण्यात आले आहेत. यातील प्रमुख दोघांवर सर्वांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये नगरपालिका शिक्षण मंडळही सहभागी असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चासाठी तालुक्यातून लाखांहून अधिक लोक जाण्याची शक्यता आहे. याचे नियोजन व्यवस्थित होण्याकरिता तासगाव शहरात जवळपास ५० स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. शिवाय गावपातळीवरही त्या त्या संघटनांनी स्वयंसेवकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)