शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाची प्रतीक्षाच

By admin | Updated: July 10, 2017 00:05 IST

जिंतूर : सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर गणवेशाचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, खाते काढण्यासाठी विविध जाचक अटीचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर गणवेशाचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, खाते काढण्यासाठी विविध जाचक अटीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन महिना होत आला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षीपर्यंत प्रतिविद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळत होते. यासाठीचा ४०० रुपयांचा निधीही शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होत होता. अनेकवेळा शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्यामध्ये गणवेश घेण्यावरुन वादाचे प्रकार घडले होते. त्यामुळे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. जिंतूर तालुक्यामध्ये १२ हजार ३ मुली तर ४ हजार ६२४ मुले असे १६ हजार ६२७ विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ४०० रुपये या प्रमाणे तालुकास्तरावर निधी देण्यात आला. गणवेशाचा निधी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेमध्ये खाते काढावे लागणार आहे. या शिवाय गणवेश खरेदी केल्याची पावती जोडावी लागणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी अगोदर बँकेमध्ये खाते काढण्याचा निर्णय घेतला. परंतु, विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आईचेही संयुक्त खाते काढावे लागणार आहे. यानुसार पालक बँकेमध्ये खाते काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. परंतु, बँकांनी धनादेश पुस्तिका घ्यावयाची असल्यास खात्यावर तीन हजार रुपये भरावे लागणार असून चलन भरुन पैसे काढावयाचे असतील तर किमान खात्यावर एक हजार रुपये ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गणवेशाचे ४०० रुपये काढल्यानंतर खात्यावर १ हजार रुपये कायमचे अडकून पडणार असल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये विद्यार्थी-पालक चकरा मारत आहेत. मात्र आठ-आठ दिवस गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गटशिक्षणाधिकारी रणखांब यांच्याशी या विषयी मोबाईलवरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.