शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस लाखांची प्रतीक्षा

By admin | Updated: October 29, 2015 00:19 IST

उस्मानाबाद : शासनाने मध्यंतरी टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता

उस्मानाबाद : शासनाने मध्यंतरी टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रबी हंगामातील टंचाईग्रस्त गावांतील सुमारे ७ हजार १६६ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचे सुमारे २४ कोटी ८४ लाख रूपये परत मिळणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाकडूनहीे सदरील रक्कम शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्याप एक छदामही मिळाला नसल्याचे समोर आले आहे.सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्याला टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यही हातबल झाले आहेत. हा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने टंचाईग्रस्त भागासाठी विविध उपायोजना, सवलती जाहीर केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून दहावी, बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांतील दहावीच्या वर्गातील ३ हजार ९५४ आणि बारावीच्या वर्गातील ३ हजार २१३ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचे २४ लाख ८४ हजार ६२० रूपये परत मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून मागणीही करण्यात आली आहे. परंतु, अद्याप छदामही मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने शुल्क माफीची घोषणा केली असली तरी ती अद्याप प्रत्यक्षात उतरली नसल्याने विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, खरीप हंगामातील टंचाईग्रस्त गावातील सात हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार २७ लाख २४ हजार ५५५ रूपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. ही रक्कम शासनाकडून उपलब्ध झाली असून वाटपही झाली आहे.(प्रतिनिधी)शासनाने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुलक माफ करण्यात आले आहे. या निर्णयाचा जिल्हाभरातील सुमारे २५ हजारांवर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सदरील विद्यार्थ्यांना कसल्याही स्वरूपाचे शुल्क आकारू नये. शुल्क आकारल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकावर राहिल, असे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिवांनी कळविले आहे.