शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

चोवीस लाखांची प्रतीक्षा

By admin | Updated: October 29, 2015 00:19 IST

उस्मानाबाद : शासनाने मध्यंतरी टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता

उस्मानाबाद : शासनाने मध्यंतरी टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रबी हंगामातील टंचाईग्रस्त गावांतील सुमारे ७ हजार १६६ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचे सुमारे २४ कोटी ८४ लाख रूपये परत मिळणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाकडूनहीे सदरील रक्कम शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्याप एक छदामही मिळाला नसल्याचे समोर आले आहे.सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्याला टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यही हातबल झाले आहेत. हा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने टंचाईग्रस्त भागासाठी विविध उपायोजना, सवलती जाहीर केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून दहावी, बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांतील दहावीच्या वर्गातील ३ हजार ९५४ आणि बारावीच्या वर्गातील ३ हजार २१३ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचे २४ लाख ८४ हजार ६२० रूपये परत मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून मागणीही करण्यात आली आहे. परंतु, अद्याप छदामही मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने शुल्क माफीची घोषणा केली असली तरी ती अद्याप प्रत्यक्षात उतरली नसल्याने विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, खरीप हंगामातील टंचाईग्रस्त गावातील सात हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार २७ लाख २४ हजार ५५५ रूपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. ही रक्कम शासनाकडून उपलब्ध झाली असून वाटपही झाली आहे.(प्रतिनिधी)शासनाने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुलक माफ करण्यात आले आहे. या निर्णयाचा जिल्हाभरातील सुमारे २५ हजारांवर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सदरील विद्यार्थ्यांना कसल्याही स्वरूपाचे शुल्क आकारू नये. शुल्क आकारल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकावर राहिल, असे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिवांनी कळविले आहे.