शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

विंधन विहिरींचे पंप वेटिंगवर !

By admin | Updated: August 9, 2014 00:38 IST

लातूर : लातूर शहरात पाणीटंचाईची ओरड आॅगस्ट महिन्यातही कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या

लातूर : लातूर शहरात पाणीटंचाईची ओरड आॅगस्ट महिन्यातही कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूरकरांना दिलासा देण्यासाठी यावर्षी शहरातील काही भागांत विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. जवळपास दहा विंधन विहिरी घेण्यात आल्या असून, महिना लोटत आला तरी अद्याप बहुतांश विंधन विहिरींना पंपच बसले नसल्याने त्या विंधन विहिरी सध्या तरी शोभेच्या वस्तूच बनल्या आहेत.मूलभूत, पायाभूत सुविधा व नगरोत्थान योजनेतून विंधन विहीर घेण्यासाठी जवळपास २० नगरसेवकांनी मागणी केली होती. त्यानुसार विंधन विहीर, विद्युतपंप, पाण्याची टाकी उभारणे व अन्य खर्चांसाठी २ लाख ५० हजार रुपयांची मनपा प्रशासनाने तरतूद केली होती. शहरात किती ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या, किती ठिकाणचे काम सुरू आहे, पाणीटंचाई असलेल्या प्रभागांची ओरड आदी बाबींची माहिती ठेवणाऱ्या पाणीपुरवठा विभागात विंधन विहिरींबाबत तोकडीच माहिती आहे. ज्या भागांत विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत, तेथील नागरिक पंप बसविण्याच्या मागणीसाठी मनपाकडे खेटे घालत आहेत. टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना विंधन विहिरींना लागलेल्या पाण्यामुळे सुखावलेल्या नागरिकांना महिना लोटला तरी अद्यापही दिलासा मिळालेला नाही. ज्या भागांत तीव्र पाणीटंचाई आहे, अशा भागांमध्ये मागणीप्रमाणे टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. लातूर मनपाच्या मालकीची दोन व भाडेतत्वावर लावण्यात आलेल्या १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. विंधन विहिरींना पाणी आहे. परंतु, पंप नसल्याने त्या बंद आहेत. (प्रतिनिधी)विंधन विहिरीच्या कामासंदर्भात दहा ठिकाणची आॅर्डर पाणीपुरवठा विभागाने काढली आहे. जवळपास दहा ठिकाणी विंधन विहिरीही घेण्यात आल्या आहेत. विद्युत कनेक्शनसाठी महावितरणला अर्ज दिला आहे. गरजेनुसार विंधन विहिरी घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे. किती ठिकाणी पंप बसले, किती विंधन विहिरी घेण्यात आल्या, किती शिल्लक आहेत, याबाबतची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख यादव यांनाही माहीत नसल्याचे स्वत: त्यांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.