शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाची अद्यापही प्रतीक्षा

By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST

सोनपेठ : तालुक्यातील खरीप पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी तयारी सुरू केली आहे.

सोनपेठ : तालुक्यातील खरीप पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी तयारी सुरू केली आहे. जमिनीच्या मशागती शेवटच्या टप्प्यात असून पेरणीच्या वेळी सावकाराच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकर्‍यांना बँकेकडून तातडीने पीककर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी शेतीतील संकटांना सामोरे जात खरीप हंगामाच्या पीक उत्पादनाचे नियोजन सुरू केले आहे. शेतीतील नियोजन करताना लागणारे पैशांचे नियोजनही करण्यासाठी शेतकर्‍यांनी खाजगी सावकारांच्या दारात चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. राष्टÑीयीकृत बँकेकडून दिल्या जाणारे अल्प व्याजदरातील कर्ज मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी बँकेकडेही चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. ऐन पेरणीच्या गडबडीत पीक कर्ज वाटप सुरू होते. त्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीकडे पाठ फिरवित बँकेसमोर ठाण मांडावे लागते. शेतीतील पेरणीची वेळ विलंबाने झाल्याने पीक उत्पादनात घट येते. त्यामुळे मे महिन्याच्या १५ तारखेपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे नियोजन बँकेने करणे अपेक्षित होते. परंतु बघू, करु या मोघम उत्तराने शेतकर्‍यांना पीककर्जासाठी अनेक चकरानंतर प्रतिसाद मिळतो. गतवर्षी बँकेने नवीन शेतकर्‍यांना पीककर्ज दिले नाही. त्यांच्याकडे कर्ज होते त्या कर्जाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यामुळे बर्‍याचशा शेतकर्‍यांना कर्जाचा लाभ मिळाला नाही. पर्यायाने अव्वाच्या सव्वाच्या व्याजदर असलेल्या खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. गत वर्ष हे शेतकर्‍यांसाठी संकटाचे वर्ष म्हटले तर वावगे ठरणार नाही़ खरीप हंगामात अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे खरीप पीक शेतकर्‍यांच्या हाती लागले नाही़ एवढे कमी की काय रबी हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा यासह फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला़ त्यानंतर शासनाने नुकसान भरपाईचे पंचनामे करून जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली़ परंतु, अद्यापही काही शेतकरी पीक नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर) अवघ्या दहा ते बारा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे़ शेतकर्‍यांनी शेतीची कामे पूर्ण केली आहेत़ आता खरिपाच्या पेरणीसाठी खत, बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी घाई करीत आहेत़ परंतु बॅकेकडून वेळेवर कर्ज मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे़सोनपेठ तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला़ त्यामुळे आता खरीप पेरणी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडे पीककर्ज काढण्यासाठी शेतकरी चकरा मारीत आहेत़ परंतु बँकेकडे चकरा मारूनही कर्ज मिळत नसल्याने आता खरीप पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेत़