शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तरुणांचा मातब्बरांना धोबीपछाड; जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत ३० टक्के तरुण कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:28 IST

Gram Panchayats of the Aurangabad district अनेकांना पहिल्याच वेळी सरपंचपद मिळण्याची अपेक्षा असल्याने, आता आरक्षणाकडे नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देमतदारांनी दिला तरुणांच्या बाजूने कौलवैजापुरात तालुक्यात सर्वाधिक तरुण विजयी

- योगेश पायघनऔरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे सोमवारी निकाल लागले. त्यात ३० टक्के तरुण कारभारी निवडून आले आहेत. तिशीच्या आतील तरुणाईची अधिक संख्या असून या नव्या दमाच्या चेहऱ्यांनाही राजकारणातील एन्ट्री आश्वासक वाटत आहे. गावासाठी काही तरी करून दाखवण्याची संधी मतदारांनी दिली, तर त्यातील अनेकांना केवळ सदस्य म्हणून अनुभव घेण्यात रस, तर अनेकांना पहिल्याच वेळी सरपंचपद मिळण्याची अपेक्षा असल्याने, आता आरक्षणाकडे नजरा लागल्या आहेत.

४६९९ सदस्यांच्या या निवडणुकीत ६१० सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ४०८९ सदस्यांची प्रत्यक्ष निवडणूक झाली. त्यासाठी ११ हजार ४९९ उमेदवार रिंगणात होते. वैजापूर १०५, सिल्लोड ८३, कन्नड ८३. पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयगाव ४०, तर खुलताबादमध्ये २५ ग्रामपंचायतींमध्ये ३० टक्क्याहून अधिक तरुण उमेदवार निवडून आल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. या तरुणांनी मातब्बरांना धोबीपछाड दिली असून आता गावाचा रखडलेला विकास करू, अशी भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

वैजापुरात तालुक्यात सर्वाधिक तरुण विजयीवैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तालुक्यातील २१ ते ३२ वयोगटातील सर्वाधिक सदस्य असण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी दिली, तर सरपंच पदाच्या सोडतीनंतर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची माहिती निवडणूक घेणाऱ्या यंत्रणेकडून जिल्हा प्रशासनाला येईल. त्यानंतर जिल्हा प्रशासन पंचायत विभागाला सदस्यांची जिल्ह्याची एकत्रित संकलित यादी देईल, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील भोकरे म्हणाले.

उमेदवारांचे व्हिजनहजाराहून अधिक योजना आहेत. गावात या योजनांचे लाभार्थी वाढविणे, वित्त आयोगाचा आणि योजनांचा निधी योग्य पद्धतीने खर्च करणे आणि निवडणूक संपल्याने एकोप्याने विकासात लोकसहभाग करून घेण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित सदस्यांनी सांगितले.

योजनांचा लाभ मिळवून देणारअभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकतेय. त्या शिक्षणाचा गावासाठी उपयोग व्हावा असे वाटते. गावात व्यायामशाळा, अभ्यासिका सुरू करायची आहे. वयोवृद्ध लोकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करायच्या असून सर्व गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार.- मनीषा शेळके, कुंभेफळ

संधीचे सोने करेनगावातील बेरोजगार युवक स्वयंरोजगाराकडे वळावेत. व्यायामासाठी व्यायामशाळा, वाचनसंस्कृती रुजावी यासाठी ग्रंथालय, तर वयोवृद्ध गरीब कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. युवा असताना गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला, त्या संधीचे सोने करेन.- संदीप बनसोडे, वरुड

विश्वास सार्थ ठरवूगावात जाण्यासाठीचा रस्ता आणि गावासाठी स्मशानभूमी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावातील गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, गावाच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देऊ. मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू.- गजानन ढगे, आमखेडा

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या : ६१७निवडून आलेले उमेदवार : ४६९९२१ ते ३२ वयोगटातील उमेदवार : ३० टक्के 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक