शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

मतदार नोंदणी; ३ कोटी खर्च

By admin | Updated: October 15, 2016 00:52 IST

लातूर : निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान सुरू असून, गेल्या तीन वर्षांत सप्टेंबर ते आॅक्टोबर या दरम्यान अभियान राबविण्यात आले आहे.

लातूर : निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान सुरू असून, गेल्या तीन वर्षांत सप्टेंबर ते आॅक्टोबर या दरम्यान अभियान राबविण्यात आले आहे. त्यात ३१ हजार ९९३ मतदार वाढले असून, ही टक्केवारी ०.८१ आहे. दरम्यान, १९१९ केंद्रांवर झालेल्या या मतदार नोंदणीकरिता एका वर्षासाठी ९५ लाख ९५ हजार रुपये असे एकूण तीन वर्षांसाठी २ कोटी ८७ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात ही मतदार नोंदणी प्रत्येकवर्षी सप्टेंबर ते आॅक्टोबर दरम्यान होते. यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जाते. २३ सप्टेंबर २०१४ अखेरपर्यंत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या २ लाख ९३ हजार ५२९, लातूर शहर ३ लाख २९ हजार २०५, अहमदपूर २ लाख ८९ हजार ४३८, उदगीर २ लाख ७० हजार ८८२, निलंगा २ लाख ८४ हजार ६८९ आणि औसा २ लाख ५७ हजार ५३ अशी एकूण ६ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या १७ लाख २४ हजार ७९६ नोंदविण्यात आली होती. यावेळी एकूण ९६.१५ टक्के मतदार या मतदारसंघात होता. २०१४ साली झालेल्या निवडणुका या मतदारांच्या मतांवर झाल्या. त्यानंतर २०१४-१५ ते २०१६-१७ असे तीन वर्षे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. लातूर जिल्ह्यातील १ हजार ९१९ मतदार नोंदणी केंद्रावर या मतदारांची नोंदणी करण्यात आली. तीन वर्षांत ०.८१ टक्के मतदारांची वाढ झाल्याची आकडेवारी जिल्हा निवडणूक कार्यालयातून हाती आली आहे. २०१४ सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मतदारांच्या संख्येत यंदा २०१६ च्या नोंदणीमध्ये ३१ हजार ९९३ मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकाच वेळी ६ विधानसभा मतदारसंघातील १ हजार ९१९ नोंदणी केंद्रांवर ही नोंदणी केली जाते. एका नोंदणी केंद्रासाठी शासनाकडून ५ हजार रुपये खर्च केला जातो. एका वर्षासाठी ९५ लाख ९५ हजार असा खर्च करण्यात आला आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ३१ हजार ९९३ नव्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. (प्रतिनिधी)