शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

विझोरा तलावास गळती

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

वालसावंगी/धावडा : भोकरदन तालुक्यातील विझोरा शिवारात मुख्य रस्त्या लगत तलाव आहे. या तलावास दोन ठिाकणी मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी काही दिवसापासून वाया जात आहे.

वालसावंगी/धावडा : भोकरदन तालुक्यातील विझोरा शिवारात मुख्य रस्त्या लगत तलाव आहे. या तलावास दोन ठिाकणी मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी काही दिवसापासून वाया जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तात्काळ दुरूस्ती न केल्यास सर्वपाणी वायाजाण्याचीी भीती काही जागरुक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.विझोरा येथील लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने येथे हा तलावा करण्यात आलेला आहे. परंतु काही दिवसापासुन या तलावाच्या सांडव्याच्या भिंती खालून दोन मोठे भगदाड पडले आहे. सांडव्याची भिंत पाच ते सहा फुट उंच आहे. एकीकडे शासनाचे पाणी आडवा पाणी जिरवा धोरण असून मात्र दुसरीकडे मात्र नियोजन शुन्य कारभारामुळे पाणी वाया जात आहे.जिल्हा परिषद अंतर्गत नुकतेच नदी, नाल्यावर वनराईबंधारे तयार करून आडवा, पाणी जिरवा ही मोहीम सुरु आहे. . मात्र येथे अडलेलेच पाणी वाया जात असेल तर याला काय म्हणावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या भगदाडामुळे पाणी वाया जात असल्याने तलावातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात दिवसेदिवस कमी होत आहे. त्यामुळे तलाव रिकामे होऊन भीषण पाणीटंचाई निर्माण होईल.या परिसराताील शेतकऱ्यांना तलाव भरल्याने पाण्याची टंचाई भासत नव्हती. मात्र पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण रिकाम्या होत आहे. याची मात्र पाटबंधारे विभागास काही देणेघेणे नसल्याचे येथील शेतकरी जाबेर शहाशहा खान पठाण,अस्लम शहा पठाण, राउबा टेंबरे, साजिद पठाण, राजू टेंभरे यांच्यासह शेतकऱ्यानी सांगितले.या परिसरातील पाणी पातळी झपाटयाने कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मका, कपाशी, सोयाबीन या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदील आहे. या तलावामुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येते.विशेष हा तलाव एका आश्रम शाळेला लागुन आहे. या तलावामुळे शाळेस पिण्याच्या पाणी प्रश्न तात्पुरता मिटला असतांना व विझोरा गावासही या धरणातच पाणीपुरवठ्याची विहीर आहे. पाणी वाया जात असल्याने भविष्यात परिसरातील तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. एकतर सिंचन क्षेत्र कमी आहे. शासन सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देत आहे. असे असले तरी तलावातून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. याकडे पाटबंधारे विभागासह अन्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भगदाड तात्काळ बुजवावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)