शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विष्णूपुरीत ४ दलघमी पाणी

By admin | Updated: July 22, 2014 00:19 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाची दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणीपातळी व पावसाने दिलेले ओढ त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाची दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणीपातळी व पावसाने दिलेले ओढ त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ४ दलघमी साठा उपलब्ध असून हे पाणी नांदेडकरांना पुढील दहा- बारा दिवस पुरेल एवढाच आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ८१़ ७ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ मागील वर्षी या तारखेपर्यंत ४९५़ ९६ मि़ मी़ पाऊस पडला होता़ यावर्षी सर्वच नक्षत्र कोरडे गेल्यामुळे नद्या, नाले, तलावही कोरडेच राहिले़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असतानाच नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी कमालीची खालावली आहे़ या प्रकल्पात केवळ ४ दलघमी साठा असून शहराला दोन दिवसाआड पाणी सोडल्यास दहा, बारा दिवसच हे पाणी पुरणार असल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले़ मागील दोन वर्षांपासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन, तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता़ जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत होते़ तर मागील दहा दिवसांपासून शहराला दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ शहराला दोन दिवसाआड २५ क्युसेस पाणी सोडले जाते़ त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ यासंदर्भात उपायुक्त वाघमारे म्हणाले, विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असला तरी दिग्रस बंधारा तसेच येलदरी प्रकल्पात आवश्यक साठा उपलब्ध आहे़ दिग्रस बंधाऱ्यात १८ दलघमी साठा आहे़ मात्र परभणीच्या नागरिकांचा हे पाणी नांदेडला सोडण्यास विरोध होत आहे़ याबाबत सोमवारी परभणी येथे बैठक घेण्यात आली आहे़ येत्या दोन- तीन दिवसांत याबद्दल निर्णय होईल़ राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे़ त्यामुळे दिग्रसचे पाणी नांदेडला सोडावेच लागेल़ जिल्ह्यात ८१़७ मि़ मी़ पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत ८१़०७ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ मागील २४ तासांत जिल्ह्यात ३़ ४ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़ तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे, कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाचे़ नांदेड ३़६३ (९१़७१), मुदखेड ०़३३ (६६़३३), अर्धापूर १़०० (५७़ ६७), भोकर १़२५ (१११़९५), उमरी ७़०० (९४़ ४०), कंधार १़ ३३ (७३़ ६४ ), लोहा ५़३३ ( ९२़८३), किनवट ६़०० ( ८७़९९), माहूर ५़५० (१०३़८७), हदगाव ०़७२ (३७़ ९०), हिमायतनगर १़३३ (२२़०१), देगलूर ५़०० (८१़०१ ), बिलोली निरंक (६५़०० ), धर्माबाद ५़०० (१०६़००), नायगाव २़६० (९९़४०), मुखेड २़५७ (१०२़४२)़ एकूण पाऊस ४८़५९ मि़ मी़ (प्रतिनिधी)पाण्याचा अपव्यय टाळावा विष्णूपुरी प्रकल्पात बारा दिवस पुरेल एवढा साठा असून पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे़ नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा़ बांधकाम किंवा इतर कामासाठी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्यास स्थानिक लोकांचा विरोध असल्याने नांदेडला पाणी सोडण्याबाबत अडचणी येत आहेत़ येत्या दोन- तीन दिवसांत याबाबत निर्णय होणार असल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले़