शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पुण्यकर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत राहील

By admin | Updated: July 31, 2014 01:26 IST

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सत्कर्मांना, धर्माच्या कामाला, पुण्य संचयाला आपल्या कार्यात शेवटचा क्रमांक देतात.

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सत्कर्मांना, धर्माच्या कामाला, पुण्य संचयाला आपल्या कार्यात शेवटचा क्रमांक देतात. वास्तविक सक्षम आहात तोवरच तुमच्या हातून पुण्यकर्म, सत्कर्म होतील. ही सत्कर्मेही तुम्ही तुमच्या कल्याणासाठीच करता; परंतु तुमच्या मनात आपण कुणावर तरी उपकार करीत असल्याची भावना असते. क्षमता आहे तोवर पुण्यसंचय करा, चांगली कर्मे करा. आज आपल्याकडील सत्ता, सौंदर्य, पैसा, ऐश्वर्य हे सारे आपली कमाई नाही. त्यात अनेकांच्या पुण्याचा वाटा आहे. आपण केलेल्या पुण्यकर्माचे धनच शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहील हे लक्षात ठेवा.आम्ही सुखात असतो तेव्हा आम्हाला देव आठवत नाही, आम्हाला चांगली कामे करण्यास फुरसत नसते आणि आम्ही दु:खात, कष्टात असल्यावर आमच्याकडून काही होत नाही. ही परिस्थिती योग्य नाही. दु:खात असताना भलेही धर्म करू नका; पण सुखात असताना उन्मादामध्ये आमच्या हातून पाप तरी होणार नाही याची काळजी घ्या. सक्षम असताना तुमच्याकडे सगळीच अनुकूलता असते. डोळे चांगले आहेत तर चांगले बघा, चांगले शरीर आहे तर सत्कर्म करा, चांगला मेंदू आहे तर सत्कर्माचा विचार करा. सुखाचा सदुपयोग करा म्हणजे दु:ख येईल तेव्हा आपली समाधी अवस्था कायम राहू शकेल. अक्षम होता, वृद्ध होता तेव्हा आपली कर्मे आपल्यासमोर उभी राहतात. आपण जोपर्यंत या जमिनीशी जोडलेलो असतो, तोपर्यंतच कोणताही ऋतू असला तरी त्यावर पाने, फळे येण्याची शक्यता असते, त्यामुळे जमीन कधी सोडू नका, एकदा का तुमची जमीन सुटली की, तुमचा जीवनवृक्ष सुकायला वेळ लागणार आहे. सत्कर्माची, धर्माची, चांगल्या कर्माची भूमी कधीही सोडू नका. त्यात कमी-जास्त होईल; परंतु ते कायम ठेवा.