शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द;आयोजनासाठी कमी कालावधी असल्याने निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:52 IST

९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

ठळक मुद्देप्रशासन : आॅक्टोबरमध्ये महोत्सवाचा मानस

औरंगाबाद : बहुचर्चित वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द करण्यात आला असून, आॅक्टोबर २०१८ मध्ये हा महोत्सव घेण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सूतोवाच केले. गुरुवारी ५ इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्यांसोबत आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांचे सादरीकरण पाहिले. तसेच महोत्सव आयोजन समिती सदस्य, जिल्हा प्रशासन, एमटीडीसी, मनपा अधिका-यांशी चर्चा केली. आयुक्त डॉ.भापकर यांनी सांगितले, शासनाकडून मिळणा-या निधीचा काही मुद्दा नाही. ९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

जिल्हाधिकारी म्हणाले...महोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एमटीडीसीचा हा महोत्सव आहे. पर्यटक येण्यासाठी सप्टेंबर ते फेबु्रवारी हा काळ असतो. फेबु्रवारीमध्ये स्थानिक नागरिकांसाठीच आयोजन केल्यासारखे होईल. विदेशी पर्यटक आल्यास महोत्सवाचे मार्केटिंग जगभर होईल. तसेच जानेवारी ते मार्च हा काळ महसूल प्रशासनासाठी वसुलीचा असतो. विभागीय यंत्रणादेखील महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी तत्पर असते. तर जिल्हा प्रशासनावरही तीच कामे असतात. त्यामुळे चांगले नियोजन करून हा महोत्सव घेण्याचे ठरले आहे.