शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कडेठाणचे गावकरी महालक्ष्मीच्या मंदिरात मुक्कामी; होमहवन झाल्यानंतरच जाणार आपल्या घरी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 20, 2023 15:38 IST

भाविक एकदा मुक्कामाला आले की, नऊ दिवस मंदिराबाहेर पडत नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवातील आठ दिवस गावकरी महालक्ष्मी देवीच्या मंदिरातच मुक्काम करतात. पहिल्या माळेला येतात व अष्टमीच्या दिवशी होमहवन झाल्यावर आपल्या घरी जातात. तोपर्यंत घरचे तोंडही पाहत नाही. होय ही प्रथा आहे पैठण तालुक्यातील ‘कडेठाण’ या तीर्थक्षेत्रातील. हे वाचून आपणास आश्चर्य वाटले असेल, पण भाविक एकदा मुक्कामाला आले की, नऊ दिवस मंदिराबाहेर पडत नाहीत.

कोल्हापूरच्या देवीचे उपपीठज्या भाविकांची कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, पण त्यांना काही कारणांस्तव कोल्हापूरला जाता आले नाही, किंवा जाता येत नसेल तर त्यांनी पैठण तालुक्यातील कडेठाण या गावात यावे, येथे महालक्ष्मीचे उपपीठ आहे. येथे देवीचे दर्शन घेतले म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यासारखेच मानले जाते.

गावकरी मंदिरात का मुक्काम करतात?कडेठाणच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवात गावकऱ्यांनी मुक्काम करण्याची पिढ्यान्पिढ्या चालत आलेली परंपरा आहे. मुक्कामी आलेले गावकरी नवरात्रोत्सवात देवीची आराधना, सेवा करतात. ही परंपरा आजतागाजत गावकरी पाळत आले आहेत.

नऊ दिवस मंदिरात काय करतात भाविक?नवरात्रीच्या पहिल्या माळेला घटस्थापना झाली की, भाविक महालक्ष्मीच्या मंदिरात मुक्कामी येतात. पाचव्या माळेपासून मुक्कामी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढते. मंदिरात सकाळची पूजा, आरती, संध्याकाळी आरती, तसेच भारुड, पोथी, दुपारी भजन, प्रवचन, रात्री कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांत भाविक सहभागी होतात. याशिवाय मंदिरात ‘सेवा’ही देतात. या काळात भाविक मंदिराबाहेर पडत नाहीत.

मंदिरात सोयीसुविधा वाढविल्यामंदिराच्या चहूबाजूने मुक्कामी आलेल्या भाविकांची राहण्याची, झोपण्याची व्यवस्था केली जाते. येथेच स्नानाची व्यवस्था, चहा-नास्ता, जेवणाची सोय करण्यात आली आहे. १८ वर्षांच्या मुलापासून ते ८० व त्यापुढील वयाचे भाविक येथे मुक्कामी येतात.महिलासुद्धा मोठ्या संख्येने मुक्कामी असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था केली आहे.

प्रत्येक घरातील एक व्यक्ती मंदिरातनवरात्रोत्सवात कठेठाण व आसपासच्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून एक व्यक्ती महालक्ष्मीच्या मंदिरात नवरात्रोत्सवात मुक्कामी येत असतो.

आजोबा, वडील.. आता मीमहालक्ष्मी आमची कुलदेवी आहे. नवरात्रोत्सवात देवीची भक्ती करण्यासाठी आम्ही मंदिरात मुक्कामी येतो. माझे आजोबा त्यानंतर वडील येथे मुक्कामी येत त्यानंतर आता मी ही परंपरा कायम ठेवली आहे. यानिमित्ताने सर्व मित्र एकत्र येतात. नऊ दिवस वैराग्यासारखे सर्वजण जीवन जगतात, अशी माहिती मुक्कामी आलेले जेष्ठ नागरिक शिवाजी तवार, कालिदास तवार यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक