शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

रुई गावामध्ये वडवणी पोलीस तळ ठोकून

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

वडवणी : तालुक्यातील रुई गावाला सध्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत

वडवणी : तालुक्यातील रुई गावाला सध्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत. रविवारी वडवणी तालुक्यात पावसाचा जोर वाढत गेल्याने ही परिस्थिती अधिकच नाजूक बनली आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून वडवणी पोलिसांचा ताफा रूई गावात रविवारी तळ ठोकून होता.मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. नद्या नाल्यांसह प्रकल्पाचीही पाणीपातळी काही प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील रूई येथे मागील अनेक दिवसापासून उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील ग्रामस्थांचे सुरक्षीत जागेत पुनर्वसन करणे आवश्यक होते. तसे प्रशासनाने केले मात्र पुनर्वसनासाठी निवडलेली जागाच रूईकरांच्या धोेक्याची जाणवू लागली आहे. ज्याठिकाणी रूई ग्रामस्थांचे पुनर्वसन केले आहे ती जागा गावालगतच डोंगरपायथ्याशी आहे. मात्र ही जागा या ग्रामस्थांसाठी धोक्याचा असल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सुरक्षीत जागेत येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.पुणे जिल्ह्यातील माळीण गावात मागील काही दिवसापूर्वी मोठी दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने अवघा देश हादरून गेला होता. मंत्र्यांनी महसूल विभागाला जे गाव डोंगर पायथ्यालगत आहेत, त्यांचे सुरक्षीत जागेत पुनर्वसन करावे, असे आदेशही दिले होते. मात्र या आदेशाला बीडच्या प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. रूई गावातील लोकांसाठी सुरक्षीत जागेत स्थलांतर करण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी केले आहे. ही जागा या ग्रामस्थांसाठी धोक्याची असल्याचे येथील माजी आ.केशवराव आंधळे यांनी सांगितले. पावसात दगड थेट पत्र्याच्या शेडवरज्याठिकाणी रूई गावांचे पुनर्वसन केलेले आहे. ती जागा या लोकांसाठी धोक्याची आहे. डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसन केल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यावेळेस पाऊस व जोराचा वारा येतो त्यावेळेस डोंगरावरील दगड थेट लोकांना राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर आदळत आहेत. दगड पत्र्यावर आदळल्यानंतर मोठा आवाज होतो. अशावेळेस हे नागरिक घाबरून घराच्या बाहेर पडत असल्याचे येथील लोकांनी सांगितले.रुईत एका अधिकाऱ्यासह १५ पोलीसरविवारी दिवसभर पावसाचा जोर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा होता. या पावसामुळे कुंडलिका प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला आहे. असाच पावसाचा जोर वाढत राहिला तर येथे जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. अशी कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून वडवणी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह १५ पोलिस कर्मचारी रूईमध्ये तळ ठोकून आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निदर्शनास आल्यास बचाव कार्याला पाचारण करण्यात येईल असे साबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)