शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गणपतीच्या गावा; बांधिलकीचा ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 23:54 IST

टीम लोकमत , बीड भालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे

टीम लोकमत , बीडभालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत मूलभूत सोयी-सवलती मिळविण्यासाठी झुंजावे लागले. मात्र, गेल्या तीन वर्षांत विकासाच्या खाणाखूणा दिसू लागल्या आहेत. आता ग्रामस्थांना आधुनिकतेची स्वप्नेही पडू लागली आहेत. गणपतीबाप्पांचा वरदहस्त लाभलेल्या या गावात सामाजिक बांधिलकी जपणारे लोकही आहेत. त्यामुळे माणुसकीचे ‘दर्शन’ पावलोपावली घडते.‘लोकमत’ने शनिवारी लिंबागणेश येथे ‘स्पॉट रिपोर्टिंग’ केले. यावेळी गावकऱ्यांनी उपेक्षा अन् अपेक्षा या दोहींची गोळाबेरीज मांडली. पाचशेवर उंबरे अन् तीन हजार लोकसंख्येचे हे गाव जिल्हा परिषदेचा गट आहे. बीड मतदारसंघाचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच गटातून झाली. परिसरातील १५ ते २० गावांचा लिंबागणेशमध्ये रोजचा संपर्क असतो. गावाला चिकटूनच भालचंद्र गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. हेमाडपंथी बांधकामाचा अजोड नमुना येथे पहावयास मिळतो. भाद्रपद महिन्यात येथे यात्रा भरते. भाविकांची मोठी श्रद्धा असलेल्या या मंदिराला विकासाची प्रतीक्षा आहे. मंदिरावर चोरांची सतत वक्रदृष्टी पडलेली आहे. दगडी शिळा चोरीला गेल्या होत्या; परंतु त्या जिल्ह्याच्या सीमेवर सापडल्या. तत्पूर्वी एकदा व २६ जानेवारी रोजी मंदिरातील दानपेटी फोडली, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. चोरांनी दानपेटीला हात लावल्यावर सीसीटीव्ही बसविण्यास मुहूर्त मिळाला. भाविकांचा ओघ पाहता येथे पुरेशा सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करावा अन् मंदिराचा कायापालट करावा अशी मागणी गावकरी अनेक दिवसांपासून करताहेत. देवस्थानच्या नावे ६२ एकर जमीन असून मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.प्रत्येक गल्लीत दर्जेदार रस्ते, सौरपथदिवे, शौचालये विकासाची साक्ष देतात. मात्र, स्वच्छतेचा अभाव आहे. सार्वजनिक शौचालयाची उणिव आहे. पोलीस चौकीला हक्काची इमारत आदी प्रश्न ऐरणीवर आहेत. सरपंचांनी जपली माणुसकीसरपंच सुषमा बाळकृष्ण मुळे या बारावी उत्तीर्ण. ग्रा. पं. अस्तित्वानंतर पहिल्या महिला सरपंचपदाच्या त्या मानकरी ठरल्या. गावच्या प्रश्नांची सोडवणूक त्या स्वत: करतात. महिलांचे प्र्शन त्या अतिशय संवेदनशीलपणे हाताळतात. निराश्रीत असलेल्या दोन जुळ्या बहिणींना त्यांनी दत्तक घेतले आहे. पोटच्या लेकरागत त्या त्यांना जीव लावतात. बचत गटातून आत्मसन्मान व स्वावलंबनाची चळवळ त्यांनी गतिमान केली आहे. त्यांचे पती बाळकृष्ण हे पत्नीच्या कामात कधी लूडबूड करत नाहीत. विकासाचे निर्णय ग्रामसभेत होतात. त्यात केवळ सरपंचाला खुर्ची असते. वंचित- उपेक्षितांसाठी सरपंच सुषमा व त्यांचे पती बाळकृष्ण हे दोघे कायम मदतीला उभे राहतात.अंगणवाडी इमारतीची दुरवस्था तीनपैकी एका अंगणवाडीच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे बालके, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. उर्वरित दोन अंगणवाड्या सुविधायुक्त आहेत.तलाठी गायबतलाठी एस. एम. पुराणिक गायब होते. खासगी मदतनीस कागदपत्रे चाळताना आढळला.