शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

गणपतीच्या गावा; बांधिलकीचा ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 23:54 IST

टीम लोकमत , बीड भालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे

टीम लोकमत , बीडभालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत मूलभूत सोयी-सवलती मिळविण्यासाठी झुंजावे लागले. मात्र, गेल्या तीन वर्षांत विकासाच्या खाणाखूणा दिसू लागल्या आहेत. आता ग्रामस्थांना आधुनिकतेची स्वप्नेही पडू लागली आहेत. गणपतीबाप्पांचा वरदहस्त लाभलेल्या या गावात सामाजिक बांधिलकी जपणारे लोकही आहेत. त्यामुळे माणुसकीचे ‘दर्शन’ पावलोपावली घडते.‘लोकमत’ने शनिवारी लिंबागणेश येथे ‘स्पॉट रिपोर्टिंग’ केले. यावेळी गावकऱ्यांनी उपेक्षा अन् अपेक्षा या दोहींची गोळाबेरीज मांडली. पाचशेवर उंबरे अन् तीन हजार लोकसंख्येचे हे गाव जिल्हा परिषदेचा गट आहे. बीड मतदारसंघाचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच गटातून झाली. परिसरातील १५ ते २० गावांचा लिंबागणेशमध्ये रोजचा संपर्क असतो. गावाला चिकटूनच भालचंद्र गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. हेमाडपंथी बांधकामाचा अजोड नमुना येथे पहावयास मिळतो. भाद्रपद महिन्यात येथे यात्रा भरते. भाविकांची मोठी श्रद्धा असलेल्या या मंदिराला विकासाची प्रतीक्षा आहे. मंदिरावर चोरांची सतत वक्रदृष्टी पडलेली आहे. दगडी शिळा चोरीला गेल्या होत्या; परंतु त्या जिल्ह्याच्या सीमेवर सापडल्या. तत्पूर्वी एकदा व २६ जानेवारी रोजी मंदिरातील दानपेटी फोडली, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. चोरांनी दानपेटीला हात लावल्यावर सीसीटीव्ही बसविण्यास मुहूर्त मिळाला. भाविकांचा ओघ पाहता येथे पुरेशा सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करावा अन् मंदिराचा कायापालट करावा अशी मागणी गावकरी अनेक दिवसांपासून करताहेत. देवस्थानच्या नावे ६२ एकर जमीन असून मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.प्रत्येक गल्लीत दर्जेदार रस्ते, सौरपथदिवे, शौचालये विकासाची साक्ष देतात. मात्र, स्वच्छतेचा अभाव आहे. सार्वजनिक शौचालयाची उणिव आहे. पोलीस चौकीला हक्काची इमारत आदी प्रश्न ऐरणीवर आहेत. सरपंचांनी जपली माणुसकीसरपंच सुषमा बाळकृष्ण मुळे या बारावी उत्तीर्ण. ग्रा. पं. अस्तित्वानंतर पहिल्या महिला सरपंचपदाच्या त्या मानकरी ठरल्या. गावच्या प्रश्नांची सोडवणूक त्या स्वत: करतात. महिलांचे प्र्शन त्या अतिशय संवेदनशीलपणे हाताळतात. निराश्रीत असलेल्या दोन जुळ्या बहिणींना त्यांनी दत्तक घेतले आहे. पोटच्या लेकरागत त्या त्यांना जीव लावतात. बचत गटातून आत्मसन्मान व स्वावलंबनाची चळवळ त्यांनी गतिमान केली आहे. त्यांचे पती बाळकृष्ण हे पत्नीच्या कामात कधी लूडबूड करत नाहीत. विकासाचे निर्णय ग्रामसभेत होतात. त्यात केवळ सरपंचाला खुर्ची असते. वंचित- उपेक्षितांसाठी सरपंच सुषमा व त्यांचे पती बाळकृष्ण हे दोघे कायम मदतीला उभे राहतात.अंगणवाडी इमारतीची दुरवस्था तीनपैकी एका अंगणवाडीच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे बालके, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. उर्वरित दोन अंगणवाड्या सुविधायुक्त आहेत.तलाठी गायबतलाठी एस. एम. पुराणिक गायब होते. खासगी मदतनीस कागदपत्रे चाळताना आढळला.