शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुरु होणार ग्राम बाल विकास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:49 IST

कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देयाशिवाय अंगणवाड्यांमध्ये कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

औरंगाबाद : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय अंगणवाड्यांमध्ये कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार आहे. यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती बालके कुपोषित आहेत, याचा गावनिहाय शोध घेणे सोपे होणार आहे, असे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात नुकतेच रुजू झालेले महिला व बालविकास अधिकारी प्रल्हाद मिरकले यांनी सांगितले.

यापूर्वीचे महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांची बदली अहमदनगर जिल्हा परिषदेत झाली. ते तीन दिवसांपूर्वीच येथून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागेवर प्रल्हाद मिरकले हे रुजू झाले आहेत. महिला व बालकल्याण विभागाची सूत्रे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अंगणवाड्यांमध्ये नव्याने कार्यरत केल्या जाणाऱ्या ग्राम बाल विकास केंद्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

तीव्र कमी वजनाची बालकांची, तसेच वजन व उंची कमी (सॅम) असलेल्या बालकांची संख्या कमी करण्यासाठी, अर्थात कुपोषण कमी करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. अंगणवाड्यांमार्फत पोषण आहार दिला जातो. याशिवाय काही बालके आजारी असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत संदर्भ सेवाही दिल्या जातात. प्रामुख्याने ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित (सॅम) बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश असेल. या बालकांना पालक हे नियमितपणे ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये घेऊन येतील. दिवसभर अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांची देखभाल करतील. आरोग्याची टीमही बालकांच्या तपासणीसाठी तैनात असेल, असे मिरकले म्हणाले.

यापुढे अंगणवाड्यांमार्फत कुपोषित वर्गवारीनुसार कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रालयात बसून कुपोषित बालकाचे नाव शोधता येणार आहे. कुपोषित बालकांना मूग, मठ मोडीची उसळ यासह इतर पौष्टिक आहार दिला जाणार आहे. 

बालविकास केंद्राचे नेमके काम काय असेलबाल ग्राम विकास केंद्रामार्फत सॅम अर्थात तीव्र कुपोषित बालकांचा सर्वंकष विकास सुनिश्चित करण्यावर भर दिला जाईल. औषधोपचारातही परिणाम न दिसणाऱ्या ‘सॅम’ बालकांची सविस्तर तपासणी करणे, जिल्हा परिषदेचे एकात्मिक बालविकास केंद्र, तसेच आरोग्य विभागामार्फत ‘सॅम’ बालकांच्या पालकांचे समुपदेशन करणे, तीव्र कुपोषित बालकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य