शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुरु होणार ग्राम बाल विकास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:49 IST

कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देयाशिवाय अंगणवाड्यांमध्ये कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

औरंगाबाद : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय अंगणवाड्यांमध्ये कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार आहे. यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती बालके कुपोषित आहेत, याचा गावनिहाय शोध घेणे सोपे होणार आहे, असे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात नुकतेच रुजू झालेले महिला व बालविकास अधिकारी प्रल्हाद मिरकले यांनी सांगितले.

यापूर्वीचे महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांची बदली अहमदनगर जिल्हा परिषदेत झाली. ते तीन दिवसांपूर्वीच येथून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागेवर प्रल्हाद मिरकले हे रुजू झाले आहेत. महिला व बालकल्याण विभागाची सूत्रे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अंगणवाड्यांमध्ये नव्याने कार्यरत केल्या जाणाऱ्या ग्राम बाल विकास केंद्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

तीव्र कमी वजनाची बालकांची, तसेच वजन व उंची कमी (सॅम) असलेल्या बालकांची संख्या कमी करण्यासाठी, अर्थात कुपोषण कमी करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. अंगणवाड्यांमार्फत पोषण आहार दिला जातो. याशिवाय काही बालके आजारी असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत संदर्भ सेवाही दिल्या जातात. प्रामुख्याने ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित (सॅम) बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश असेल. या बालकांना पालक हे नियमितपणे ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये घेऊन येतील. दिवसभर अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांची देखभाल करतील. आरोग्याची टीमही बालकांच्या तपासणीसाठी तैनात असेल, असे मिरकले म्हणाले.

यापुढे अंगणवाड्यांमार्फत कुपोषित वर्गवारीनुसार कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रालयात बसून कुपोषित बालकाचे नाव शोधता येणार आहे. कुपोषित बालकांना मूग, मठ मोडीची उसळ यासह इतर पौष्टिक आहार दिला जाणार आहे. 

बालविकास केंद्राचे नेमके काम काय असेलबाल ग्राम विकास केंद्रामार्फत सॅम अर्थात तीव्र कुपोषित बालकांचा सर्वंकष विकास सुनिश्चित करण्यावर भर दिला जाईल. औषधोपचारातही परिणाम न दिसणाऱ्या ‘सॅम’ बालकांची सविस्तर तपासणी करणे, जिल्हा परिषदेचे एकात्मिक बालविकास केंद्र, तसेच आरोग्य विभागामार्फत ‘सॅम’ बालकांच्या पालकांचे समुपदेशन करणे, तीव्र कुपोषित बालकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य