शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

कुलगुरुंचे बोल ठरले खोटे

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

नजीर शेख, औरंगाबाद विद्यापीठातील ‘लोकमत’ ने उघडकीस आणलेल्या पीएच. डी. घोटाळ्याप्रकरणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी चार आजी, माजी कुलगुरूंनी समिती नेमल्याचे जाहीर केले.

नजीर शेख, औरंगाबादतीन महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘लोकमत’ ने उघडकीस आणलेल्या पीएच. डी. घोटाळ्याप्रकरणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी चार आजी, माजी कुलगुरूंनी समिती नेमल्याचे जाहीर केले. मात्र, कुलगुरूंनी अशी कोणतीही समितीच नेमली नसल्याचे समोर आले असून, घोटाळा दडपण्यासाठी कुलगुरू चक्क खोटे बोलल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यापीठातील पीएच.डी.चा बाजार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील अनेक गाईड हे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करून पीएच.डी. बहाल करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या मालिकेने समोर आणले होते. १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत ही मालिका चालली. जालना येथील समाजकार्य महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेची या प्रकरणात गाईडशिपही रद्द झाली. याशिवाय विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील एका प्राध्यापिकेने चालविलेला विद्यार्थ्याचा छळ, मराठी विभागातील तसेच बीड येथील डॉ. एम. के. साबळे यांनी विद्यार्थ्यांकडून पीएच. डी. च्या बदल्यात विमा पॉलिसी उतरवून घेतल्याचे प्रकरणही या मालिकेद्वारे समोर आले होेते. मराठी विषयात पीएच.डी.साठी डॉ. भारत हंडिबाग यांनी एक लाख रुपये मागितल्याचे तसेच त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे प्रकरणही उजेडात आणले होेते. विद्यापीठातील अनेक प्राध्यापक ५० हजार ते तीन लाखांपर्यंतची रक्कम वसूल केल्याशिवाय पीएच.डी. पूर्ण करवून घेत नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता. याप्रकरणी कुलगुरूडॉ. चोपडे यांनी पीएच. डी. च्या घोटाळ्याप्रकरणी चार आजी, माजी कुलगुरूंची समिती नेमल्याचे जाहीर केले. या समितीत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. माणिकराव साळुंके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एम. माळी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग यांचा समावेश असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली होती. याच वेळी मार्च महिन्यात समोर आलेल्या आणि पीएच. डी. घोटाळ्यांबरोबरच याआधी आर्थिक व्यवहार होऊन दिलेल्या पीएच. डी. प्रकरणांचाही छडा लावला जाईल, असे डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले होते. कुलगुरूंनी समिती जाहीर केल्यानंतर समितीतील सदस्यांना चौकशी करण्यासंदर्भात पत्र पाठविणे, त्यांची सहमती घेणे, त्यांना कार्यकक्षा आणि अधिकार ठरविणे यासंबंधी काहीच धोरण ठरविण्यात आले नाही. विद्यार्थ्यांकडून पीएच.डी.साठी पैसे उकळणाऱ्या प्राध्यापकांच्या अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे पीएच.डी.चा बाजार मांडणाऱ्या गाईडना ना धाक राहिला, ना त्यांच्यावर कोणती कारवाई झाली. चौकशी समितीची घोषणा ही फसवी ठरली.