शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

औरंगाबाद जिल्ह्यात वाहन विक्रीत पडला ‘रिव्हर्स गीअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:28 IST

तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही कालावधीत प्रत्येक वर्षी वाहनांची संख्या वाढत होती. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा ११ हजारांनी वाहन संख्या घटल्याचे समोर आले. त्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळाचे कारण पुढे केले जात आहे. या सगळ्यामुळे आरटीओ कार्यालयाला २०१८-१९ या आर्थिक वर्षात दिलेले उद्दिष्टही पूर्ण करता आले नाही. तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड, अशी तीन जिल्हे आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नव्या वाहनांची नोंद झाली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३ हजार ६६९ वाहनांची नोंद झाली होती. या आर्थिक वर्षात १८९ कोटी रुपयांच्या महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा झाला.

तब्बल २३३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तुलनेत २०१८-१९ या आर्थिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यात ९१ हजार ८४७ वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंद झाली. गतवर्षीपेक्षा तब्बल ११ हजार ८२२ वाहनांची घट झाल्याचे समोर आले आहे. वाहनांची संख्या घटल्यामुळे आरटीओ कार्यालयास देण्यात आलेल्या २५६ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी के वळ २२९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. वाहन संख्या कमी होण्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळ ही कारणे असल्याचे बोलले जात आहे.

उद्दिष्टासाठी प्रयत्नआरटीओ कार्यालयास दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातो; परंतु ११ हजारांनी वाहनांची संख्या कमी झाली. त्याचा परिणाम महसुलावर झाला. तरीही जुन्या वाहनांकडून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  -सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी

अनेक कारणेगेल्या चार महिन्यांपासून वाहनांची विक्री मंदावली आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. दुष्काळाचा १० ते १५ टक्के परिणाम आहे; परंतु जीएसटीचा परिणाम म्हणता येणार नाही. जीएसटीमुळे वाहन स्वस्त झाले आहे. -राहुल पगारिया, वाहन वितरक

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादTaxकर