शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

औरंगाबाद जिल्ह्यात वाहन विक्रीत पडला ‘रिव्हर्स गीअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:28 IST

तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही कालावधीत प्रत्येक वर्षी वाहनांची संख्या वाढत होती. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा ११ हजारांनी वाहन संख्या घटल्याचे समोर आले. त्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळाचे कारण पुढे केले जात आहे. या सगळ्यामुळे आरटीओ कार्यालयाला २०१८-१९ या आर्थिक वर्षात दिलेले उद्दिष्टही पूर्ण करता आले नाही. तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड, अशी तीन जिल्हे आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नव्या वाहनांची नोंद झाली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३ हजार ६६९ वाहनांची नोंद झाली होती. या आर्थिक वर्षात १८९ कोटी रुपयांच्या महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा झाला.

तब्बल २३३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तुलनेत २०१८-१९ या आर्थिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यात ९१ हजार ८४७ वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंद झाली. गतवर्षीपेक्षा तब्बल ११ हजार ८२२ वाहनांची घट झाल्याचे समोर आले आहे. वाहनांची संख्या घटल्यामुळे आरटीओ कार्यालयास देण्यात आलेल्या २५६ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी के वळ २२९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. वाहन संख्या कमी होण्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळ ही कारणे असल्याचे बोलले जात आहे.

उद्दिष्टासाठी प्रयत्नआरटीओ कार्यालयास दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातो; परंतु ११ हजारांनी वाहनांची संख्या कमी झाली. त्याचा परिणाम महसुलावर झाला. तरीही जुन्या वाहनांकडून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  -सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी

अनेक कारणेगेल्या चार महिन्यांपासून वाहनांची विक्री मंदावली आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. दुष्काळाचा १० ते १५ टक्के परिणाम आहे; परंतु जीएसटीचा परिणाम म्हणता येणार नाही. जीएसटीमुळे वाहन स्वस्त झाले आहे. -राहुल पगारिया, वाहन वितरक

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादTaxकर