शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

कनेरगाव रस्त्यामुळे वाहनधारक धास्तावले

By admin | Updated: May 22, 2014 00:34 IST

मदन बियाणी, कनेरगाव नाका हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याची झालेल्या दुरवस्थेकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले

मदन बियाणी, कनेरगाव नाका हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याची झालेल्या दुरवस्थेकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधीही याकडे पाहत नसल्याने त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून वाहने घेऊन जाताना करावी लागणारी कसरत पाहून वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. वाशिम - हिंगोली या रस्त्याचे २८ आॅगस्ट २००९ पासून काम सुरू करण्यात आले होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मिळालेल्या ४ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता यवतमाळ येथील कंत्राटदाराने केला होता. या रस्त्याचे काम २० मे २०११ रोजी पूर्ण झाले. त्यानंतर ३ वर्षे या रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदार संबंधित कंत्राटदारावर होती; परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याअधीच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित कंत्राटदाराने पूर्णत: दुर्लक्ष केले. आता तर या रस्त्यावर वाहने चालविणेच अत्यंत अवघड झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडलेले दिसून येत असून काही ठिकाणी तर १ ते २ फुट खोल खड्डे पडलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. अशा रस्त्यावर वाहने चालविने फार अवघड झाले आहे. कनेरगाव पुढील फाळेगाव पाटीजवळ तसेच फाळेगाव पाटी समोर आंबाळा, आडगाव पुलाजवळ मोठ-मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. तर वडद पाटी, चिंचाळा पंपाजवळ रस्ता उखडून गेला आहे. त्या पुढे माळहिवरा पाटी समोर रस्त्याची दुरवस्था झाली असून कलगाव उतारात तसेच चढाईवर सुद्धा रस्ता खराब झाला आहे. पारोळा पाटी ते डेन्टल कॉलेज दरम्यान खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न पडत आहे. खड्ड्यामध्ये दुचाकी, चार चाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या राज्य रस्त्यावरील अनेक वाहनधारकांशी सदर प्रतिनिधीनी चर्चा केली असता वाहन धारकांकडून चिंजाजनक प्रतिक्रिया मिळाली. त्यामध्ये कैलास तुकाराम जाधव (रा. जोडतळा), संतोष प्रजापती (मध्य प्रदेश), ओम तनपुरे, सोनू भारुका यांनी सांगितले की, या रस्त्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता पावसाळ्यापुर्वी दुरूस्ती करण्यात यावा, नसता पाऊस पडल्यानंतर रस्त्याची मोठी बिकट अवस्था होईल, असेही ते म्हणाले.