शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

माजलगावच्या बाजारात भाजीपाला कडाडला

By admin | Updated: July 1, 2014 01:01 IST

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत.

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.माजलगाव तालुका दोन धरणांच्या लाभक्षेत्रात येतो. मात्र अल्प पर्जन्याने दोन्ही धरणे कोरडी राहिल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअर आटल्याने भाजीपाल्याचे उत्पादनही घटले आहे. परिणामी या पाऊस नसल्यामुळे भाज्यांची आवकही कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे.अकोला, हिंगोलीहून कोथिंबिरीची आवकमाजलगावच्या आठवडी बाजारात येणारी कोथिंबीर ही अकोला आणि हिंगोली जिल्ह्यातून येत आहे. प्रत्येक आठवडी बाजारात तब्बल ५ ते १० क्विंटल कोथिंबीर या दोन जिल्ह्यातून येत आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे भाजी विक्रेते रामभाऊ धुमाळ यांनी सांगितले.महागाईने जीव मेटाकुटीला आला असून, आता भाजीपाल्यानेही कहर केला आहे. यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा हाच प्रश्न पडला असल्याचे पूनम काळे, रंजना नाटकर या गृहिणींनी सांगितले. सध्या बाजारात मेथी १५ ते २० रु. जुडी, कोथिंबीर ५० ते ६० रु. जुडी, पालक १० ते २०, शेपू ३० ते ४०, सिमला मिरची १५० ते १८० रु. किलो, भोपळा १५० ते १६० रु. किलो, भेंडी ९० ते १०० रु. किलो भावाने विकत घ्यावी लागत आहे. या भाज्यांसह माजलगावच्या बाजारात इतर भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्याने कडाडले आहेत. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)