शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

माजलगावच्या बाजारात भाजीपाला कडाडला

By admin | Updated: July 1, 2014 01:01 IST

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत.

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.माजलगाव तालुका दोन धरणांच्या लाभक्षेत्रात येतो. मात्र अल्प पर्जन्याने दोन्ही धरणे कोरडी राहिल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअर आटल्याने भाजीपाल्याचे उत्पादनही घटले आहे. परिणामी या पाऊस नसल्यामुळे भाज्यांची आवकही कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे.अकोला, हिंगोलीहून कोथिंबिरीची आवकमाजलगावच्या आठवडी बाजारात येणारी कोथिंबीर ही अकोला आणि हिंगोली जिल्ह्यातून येत आहे. प्रत्येक आठवडी बाजारात तब्बल ५ ते १० क्विंटल कोथिंबीर या दोन जिल्ह्यातून येत आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे भाजी विक्रेते रामभाऊ धुमाळ यांनी सांगितले.महागाईने जीव मेटाकुटीला आला असून, आता भाजीपाल्यानेही कहर केला आहे. यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा हाच प्रश्न पडला असल्याचे पूनम काळे, रंजना नाटकर या गृहिणींनी सांगितले. सध्या बाजारात मेथी १५ ते २० रु. जुडी, कोथिंबीर ५० ते ६० रु. जुडी, पालक १० ते २०, शेपू ३० ते ४०, सिमला मिरची १५० ते १८० रु. किलो, भोपळा १५० ते १६० रु. किलो, भेंडी ९० ते १०० रु. किलो भावाने विकत घ्यावी लागत आहे. या भाज्यांसह माजलगावच्या बाजारात इतर भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्याने कडाडले आहेत. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)