शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावच्या बाजारात भाजीपाला कडाडला

By admin | Updated: July 1, 2014 01:01 IST

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत.

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.माजलगाव तालुका दोन धरणांच्या लाभक्षेत्रात येतो. मात्र अल्प पर्जन्याने दोन्ही धरणे कोरडी राहिल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअर आटल्याने भाजीपाल्याचे उत्पादनही घटले आहे. परिणामी या पाऊस नसल्यामुळे भाज्यांची आवकही कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे.अकोला, हिंगोलीहून कोथिंबिरीची आवकमाजलगावच्या आठवडी बाजारात येणारी कोथिंबीर ही अकोला आणि हिंगोली जिल्ह्यातून येत आहे. प्रत्येक आठवडी बाजारात तब्बल ५ ते १० क्विंटल कोथिंबीर या दोन जिल्ह्यातून येत आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे भाजी विक्रेते रामभाऊ धुमाळ यांनी सांगितले.महागाईने जीव मेटाकुटीला आला असून, आता भाजीपाल्यानेही कहर केला आहे. यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा हाच प्रश्न पडला असल्याचे पूनम काळे, रंजना नाटकर या गृहिणींनी सांगितले. सध्या बाजारात मेथी १५ ते २० रु. जुडी, कोथिंबीर ५० ते ६० रु. जुडी, पालक १० ते २०, शेपू ३० ते ४०, सिमला मिरची १५० ते १८० रु. किलो, भोपळा १५० ते १६० रु. किलो, भेंडी ९० ते १०० रु. किलो भावाने विकत घ्यावी लागत आहे. या भाज्यांसह माजलगावच्या बाजारात इतर भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्याने कडाडले आहेत. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)