शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘वरूण’माया, खरीप वाया

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेला रिमझिम पाऊस बुधवारी दिवसभर जिल्ह्यात सुरू होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४.७५ मि. मी. पर्जन्यमान झाले आहे.मागील दोन महिन्यात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते. मात्र मंगळवारी दुपारी १२ नंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. बुधवारी दिवसभर रिमझिम सुरू राहिल्याने वातावरण आनंदी झाले होते. सुरू असलेल्या रिमझिम पावसाने तात्काळ बोअर, विहिरींना पाणी येणे शक्य नसले तरी या रिमझिम पावसाचा जोर वाढत गेला तर पुढील एक महिन्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल. यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)बीड : दीड महिन्याच्या उघडीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असले तरी खरीप हंगामातील बाजरी व तूर या पिकांना मोठा फायदा होणार आहे.खरीपातील कापूस व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे ५० टक्के तर कापूस ३० टक्के जळून खाक झाला आहे. ते नुकसान भरून निघणे मुश्किल आहे. खरीपातील या मुख्य पिकांनाच फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीपातील पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी या रिमझिमुळे बाजरी, तूर, तीळ या पिकांची दुबार पेरणी होऊ शकत असल्याचे कृषितज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरीपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी समाधानी आहे. किमान चाराटंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. (प्रतिनिधी)मंगळवारी झालेल्या पावसामध्ये माजलगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. आष्टीसह शिरूर कासार, पाटोदा, गेवराई तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.