शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

‘वरूण’माया, खरीप वाया

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेला रिमझिम पाऊस बुधवारी दिवसभर जिल्ह्यात सुरू होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४.७५ मि. मी. पर्जन्यमान झाले आहे.मागील दोन महिन्यात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते. मात्र मंगळवारी दुपारी १२ नंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. बुधवारी दिवसभर रिमझिम सुरू राहिल्याने वातावरण आनंदी झाले होते. सुरू असलेल्या रिमझिम पावसाने तात्काळ बोअर, विहिरींना पाणी येणे शक्य नसले तरी या रिमझिम पावसाचा जोर वाढत गेला तर पुढील एक महिन्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल. यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)बीड : दीड महिन्याच्या उघडीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असले तरी खरीप हंगामातील बाजरी व तूर या पिकांना मोठा फायदा होणार आहे.खरीपातील कापूस व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे ५० टक्के तर कापूस ३० टक्के जळून खाक झाला आहे. ते नुकसान भरून निघणे मुश्किल आहे. खरीपातील या मुख्य पिकांनाच फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीपातील पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी या रिमझिमुळे बाजरी, तूर, तीळ या पिकांची दुबार पेरणी होऊ शकत असल्याचे कृषितज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरीपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी समाधानी आहे. किमान चाराटंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. (प्रतिनिधी)मंगळवारी झालेल्या पावसामध्ये माजलगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. आष्टीसह शिरूर कासार, पाटोदा, गेवराई तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.