शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

‘वरूण’माया, खरीप वाया

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा

बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेला रिमझिम पाऊस बुधवारी दिवसभर जिल्ह्यात सुरू होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४.७५ मि. मी. पर्जन्यमान झाले आहे.मागील दोन महिन्यात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते. मात्र मंगळवारी दुपारी १२ नंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. बुधवारी दिवसभर रिमझिम सुरू राहिल्याने वातावरण आनंदी झाले होते. सुरू असलेल्या रिमझिम पावसाने तात्काळ बोअर, विहिरींना पाणी येणे शक्य नसले तरी या रिमझिम पावसाचा जोर वाढत गेला तर पुढील एक महिन्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल. यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)बीड : दीड महिन्याच्या उघडीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असले तरी खरीप हंगामातील बाजरी व तूर या पिकांना मोठा फायदा होणार आहे.खरीपातील कापूस व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे ५० टक्के तर कापूस ३० टक्के जळून खाक झाला आहे. ते नुकसान भरून निघणे मुश्किल आहे. खरीपातील या मुख्य पिकांनाच फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीपातील पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी या रिमझिमुळे बाजरी, तूर, तीळ या पिकांची दुबार पेरणी होऊ शकत असल्याचे कृषितज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरीपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी समाधानी आहे. किमान चाराटंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. (प्रतिनिधी)मंगळवारी झालेल्या पावसामध्ये माजलगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. आष्टीसह शिरूर कासार, पाटोदा, गेवराई तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.