शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ-अजिंठा महोत्सव यंदा बारगळणार?

By admin | Updated: November 6, 2014 01:15 IST

औरंगाबाद : पर्यटनवाढीच्या दृष्टीने, तसेच पर्यटकांसह औरंगाबादच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून सुरू झालेला व अधूनमधून होणारा नृत्य-संगीताचा वेरूळ महोत्सव

औरंगाबाद : पर्यटनवाढीच्या दृष्टीने, तसेच पर्यटकांसह औरंगाबादच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून सुरू झालेला व अधूनमधून होणारा नृत्य-संगीताचा वेरूळ महोत्सव यंदा होणार की नाही,याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जगप्रसिद्ध कैलास लेण्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथे हा महोत्सव सुरू झाला. रात्रीच्या वेळी आणि ऐन थंडीच्या दिवसात होणारा महोत्सव गैरसोयीचा ठरू लागल्याने नंतर तो २००२ पासून औरंगाबाद शहरातील विद्यापीठ परिसरात १७ व्या शतकात बांधल्या गेलेल्या ऐतिहासिक सोनेरी महलच्या पार्श्वभूमीवर वेरूळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव या नावाने सुरू झाला. यामध्ये स्थानिक कलावंतांबरोबरच देशातील प्रतिष्ठित आणि नामांकित कलावंतांना पाचारण करण्यात येते. ऐतिहासिक स्थळाच्या पार्श्वभूमीवर बहरत असलेला हा महोत्सव गेल्या वर्षी होऊ शकला नाही. आर्किटेक्ट असलेल्या आणि कलेमध्ये रुची असलेल्या जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी हा महोत्सव पुन्हा सुरू करण्याबाबत सहा महिन्यांपूर्वी सूतोवाच केले होते; मात्र नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही वेळ मिळाला नाही. वेरूळ-अजिंठा औरंगाबाद फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या समितीची बैठकही यासंदर्भात होऊ शकली नाही. राज्य पर्यटन महामंडळाचे सहकार्य असलेला हा महोत्सव यंदा त्यांच्याकडूनही दुर्लक्षित राहिला. हा महोत्सव साधारणत: डिसेंबर- जानेवारी महिन्यात होतो. आॅक्टोबर महिन्यापासून पर्यटन राजधानीतील सीझन चालू होतो. देश- विदेशातील नागरिक भेटी देतात. महोत्सवाच्या तारखांची आधी काही काळ प्रसिद्धी झाली तर ते पर्यटकांच्या सोयीचे असते. मात्र आता नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी या महोत्सवाबाबत एकही बैठक किंवा अगदी चर्चाही झालेली नाही. त्यामुळे महोत्सवाच्या तारखा ठरून त्याची प्रसिद्धी, तसेच कलावंतांच्या तारखा घेण्याचे अवघड काम होणे अशक्यच दिसत आहे. महोत्सव करावयाचा झाल्यास त्याची युद्धपातळीवर तयारी करावी लागेल, अन्यथा यंदाचा महोत्सव बारगळल्यात जमा आहे. या संदर्भात राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 1२०१२ मध्ये २६ ते २९ जानेवारीदरम्यान झालेल्या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर, बासरीवादक पं. रोणू मुजुमदार, सुफी व गझल गायक कैलास खेर आदींसह बड्या कलावंतांनी हजेरी लावून हा सोहळा दिमाखदार करण्यात वाटा उचलला. 2अर्थात त्यावेळी दिलीप शिंदे या कलाप्रेमी अधिकाऱ्याच्या पुढाकारामुळे हा महोत्सव होऊ शकला. २४०० चौरस फुटाचे भव्य स्टेज आणि सुमारे दहा हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हा महोत्सव खऱ्या अर्थाने रंगला होता; मात्र २०१३ साली हा महोत्सव होऊ शकला नाही. निधीची अडचण आणि इतर सबबी सांगण्यात आल्या. त्यामुळे औरंगाबादच्या रसिकांना दर्जेदार कलावंतांचा आविष्कार पाहण्या-ऐकण्याची संधी मिळाली नाही. हा महोत्सव घेण्याचा विचार जाहीर केला आहे. आता या समितीची बैठक घेऊन त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायला हवे. समितीच्या बैठकीनंतरच काहीतरी ठरेल.- विक्रमकुमार, जिल्हाधिकारी